शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

25 न्यायपटलांवरून होणार 21,338 प्रकरणांचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2022 05:00 IST

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वर्धाच्यावतीने आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने प्रकरणे आपसातील तडजोडीअंती निकाली काढली जाणार आहेत. विशेष म्हणजे मागील सहा वर्षांत राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून ६१ कोटी ९२ लाख २७ हजार ५४७ तडजोड मूल्य असलेल्या तब्बल १६ हजार ५७२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. लोकअदालतीत झटपट प्रकरणाचा निपटारा होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळत असल्याने ते फायद्याचे ठरते.

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबईच्या मार्गदर्शक सूचनांना केंद्रस्थानी ठेवून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष आशुतोष करमकर यांच्या नेतृत्त्वात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने शनिवार, १२ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीचे कामकाज तब्बल २५ न्यायपटलांवरून चालणार असून, त्यातील तीन पॅनल महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचे राहणार आहे. १२ मार्च रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतील एकूण २१ हजार ३३८ प्रकरणे ठेवली जाणार आहेत.१८ हजार १४१ वाद दाखल प्रकरणांचा राहणार समावेश-    यंदाच्या राष्ट्रीय लोकअदालतीत वाद प्रकरणे दाखल पूर्व प्रकरणांमध्ये ग्रामपंचायत कराबाबतची १४ हजार ४४४, बॅंकेची २ हजार ७९६, बी. एस. एन. एल.ची ४६७, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची ३१३, नगर परिषदेची कर व पाणीपट्टीची १२१ अशी एकूण १८ हजार १४१ इतकी वाद दाखल पूर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय लोकअदालतीचे हिंगणघाट येथे एक तर वर्धा शहरात राहणार दोन महिला न्यायपीठ-    शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत तीन न्यायपीठ महिला चालविणार असून, यात वर्धा येथील दोन तर हिंगणघाट येथील एका न्यायपटलाचा समावेश आहे. हिंगणघाट येथे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आर. व्ही. डफरे यांच्यासह त्यांच्या सहा महिला सहकारी, वर्धा येथे पाचव्या सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आर. आर. लोहीया यांच्यासह त्यांच्या सात महिला सहकारी आणि वर्धा येथेच दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस. पी. बाबर यांच्यासह त्यांच्या सहा महिला सहकारी सेवा देणार आहेत. या राष्ट्रीय लोकअदालतीत तब्बल तीन महिला न्यायपीठ देऊन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने स्त्री शक्तीला अभिवादनच केले आहे.

आपसी तडजोडीने निकाली निघणार प्रकरणे-    जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वर्धाच्यावतीने आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने प्रकरणे आपसातील तडजोडीअंती निकाली काढली जाणार आहेत. विशेष म्हणजे मागील सहा वर्षांत राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून ६१ कोटी ९२ लाख २७ हजार ५४७ तडजोड मूल्य असलेल्या तब्बल १६ हजार ५७२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. लोकअदालतीत झटपट प्रकरणाचा निपटारा होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळत असल्याने ते फायद्याचे ठरते.

३ हजार १९७ प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा राहणार समावेश-    शनिवारच्या राष्ट्रीय लोकअदालतीत न्यायालयातील प्रलंबित तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे १३८ एन. आय. ॲक्ट प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, ग्राहक तकार न्याय निवारण प्रकरणे अशी एकूण ३ हजार १९७ न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.

शनिवार, १२ मार्चला महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबईच्या मार्गदर्शक सूचनांना केंद्रस्थानी ठेवून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष आशुतोष करमकर यांच्या नेतृत्त्वात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. २५ न्यायपटलांवरून लोकअदालतीचे कामकाज होणार असून, २५पैकी तीन न्यायपीठ महिलांची राहणार आहेत.- निशांत परमा, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वर्धा.

 

टॅग्स :Lokadalatलोकअदालत