शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

२२९ गावांना पाणी टंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 23:53 IST

उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी टंचाई डोके वर काढते. दरवर्षी पाणी टंचाईवर मात करण्याकरिता कोट्यवधी रुपयांच्या उपाययोजना आखल्या जातात.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाकडून ३९१ उपाययोजनांवर ६ कोटी २ लाख रुपयांचा खर्च

आॅनलाईन लोकमतवर्धा : उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी टंचाई डोके वर काढते. दरवर्षी पाणी टंचाईवर मात करण्याकरिता कोट्यवधी रुपयांच्या उपाययोजना आखल्या जातात. परंतु यावर कायमस्वरूपी उपाययोजना आखल्या जात नाही. यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील २२९ गावांना पाणी टंचाईची झळ बसणार आहे. या गावांतील नागरिकांना दिलासा देण्याकरिता जिल्हा प्रशासनाच्यावतीने ६ कोटी २ लाख रुपयांचा आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे.गत उन्हाळ्याच्या तुलनेत यंदा पाणीटंचाई असलेली गावे कमी असल्याचे मंजुर आराखड्यावरून दिसत आहे. गत उन्हाळ्यात २८६ गावात पाणीटंचाई जाणवल्याचा आराखडा तयार करण्यात आला होता. या गावातील पाणी टंचाई निवारण्याकरिता ४७८ उपाययोजनांवर ७ कोटी ९८ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. ऐवढी रक्कम खर्च होवूनही यंदा २२९ गावांना पाणी टंचाईची झळ बसणार असल्याचे दिसत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवणाºया गावात ३९१ उपाययोजना आखण्यात आल्या आहे.करण्यात येणाºया उपाययोजनापाणी टंचाई निवारण्याकरिता टंचाईग्रस्त गावात ४६ विहिरीचे खोलीकरण तर १२९ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. १२४ नळयोजनांची दुरुस्ती करण्यात येणार असून तात्पूरती पुरक योजना म्हणून एक योजना मंजूर करण्यात आली आहे. सध्या टंचाई असलेल्या गावात सात उपाययोजनांची दुरुस्ती प्रगतीपथावर आहे. या उपाययोजना तीन महिन्याकरिता असल्याचे सांगण्यात आले आहे.१५ जलाशयात ४१.३८ टक्के जलसाठावर्धा जिल्ह्यात मोठे आणि मध्यम असे मिळून १५ जलाशय आहेत. या जलाशयातून शेतीच्या सिंचनासह व्यवसाय, उद्योग व नागरिकांना पिण्यासाठी पाणी पुरविले जाते. सध्या या जलाशयात पाण्याची स्थिती ठिकठाक असली तरी उन्हाळ्याच्या दिवसात झपाट्याने घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या या जलाशयात ४१.३८ टक्के उपयुक्त जलसाठा असल्याचे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.अत्यल्प पावसामुळे स्थिती बिकटजिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. त्यामुळे जलसाठे पूर्णत: भरले नाही. परिणामी हिवाळ्याच्या अखेरीसच पाण्याची पातळी निम्यापेक्षा कमी आहे. यातच यंदाच्या उन्हाळ्यात सूर्य आग ओकणार असल्याचे भाकित हवामान खात्याने वर्तविले आहे. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात या जलसाठ्यात पाणी राहील अथवा नाही याबाबत साशंकता आहे.