शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अवकाळीचा २३ घरांना फटका; तीन जनावरांचा मृत्यू

By महेश सायखेडे | Updated: April 10, 2023 16:23 IST

जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवारी वादळी वारा, दामिणी गर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी

वर्धा : हवामान खात्याचा अंदाज खरा ठरत जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवारी वादळी वारा, दामिणी गर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. याच नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात २३ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. तर तीन जनावरांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.

जिल्ह्यातील विविध भागात वादळीवाऱ्यासह कोसळधार बरसलेल्या अवकाळी पावसामुळे उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला आहे. १०५.५ हेक्टरवरील उभ्या पिकांचे ३३ टक्केच्या आत तर १४.२५ हेक्टरवरील उभ्या पिकांचे ३३ टक्केच्यावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाचा आहे. प्रत्यक्षात कुठे किती शेतपिकाचे नुकसान झाले याची इत्यंभूत माहिती सध्या कृषी आणि महसूल यंत्रणेच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन जाणून घेत आहे.

शुक्रवारी आणि शनिवारी जिल्ह्यावर ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीत एकूण तीन जनावरांचा मृत्यू झाला. यात दोन बैल तर एका गोऱ्हाचा समावेश आहे. देवळी व सेलू तालुक्यात प्रत्येकी एक बैलाचा तर हिंगणघाट तालुक्यात गोऱ्ह्याचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.कुठल्या तालुक्यात किती घरांचे नुकसान?देवळी : १३सेलू : ०२कारंजा : ०८

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊसwardha-acवर्धा