शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

४ हजार तूर उत्पादकांचे २६.५० कोटी थकले

By admin | Published: June 19, 2017 1:07 AM

मान्सून दारात आहे. आर्थिक विवंचनेत पेरणी करण्याचे संकट घोंगावत असताना तालुक्यातील ४ हजार तूर

हंगामाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : मान्सून दारात आहे. आर्थिक विवंचनेत पेरणी करण्याचे संकट घोंगावत असताना तालुक्यातील ४ हजार तूर उत्पादकांचे तब्बल २६ कोटी ५० लाख रुपयांचे चुकारे शासनाकडे अडकले आहेत. त्यांना थकीत चुकाऱ्याची रक्कम व्याजासह देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तुरीला मिळालेल्या उत्तम दरामुळे गत हंगामात शेतकऱ्यांनी तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले होते. परंतु शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे तूर उत्पादक अडचणीत आला. शेतकऱ्यांची तूर बाजारात येताच भाव गडगडले. व्यापारी हमी भावापेक्षा हजार रुपये कमी दराने तुरीची खरेदी करीत होते. यामुळे होणारी लुट टाळण्याची मागणी करीत शासकीय खरेदीची मागणी करण्यात आली. यात शासनाने आपण शेतकऱ्यांच्या पाठशी आहो, असे दर्शवित ३ जानेवारी २०१७ पासून २२ एप्रिल पर्यंत नाफेडच्या माध्यमातून तुरीची खरेदी केली. यात तालुक्यातील २ हजार ४७८ शेतकऱ्यांकडून नाफेडने ४२ हजार ४७१ क्विंटल तुरीची खरेदी केली; परंतु विविध कारणांनी ही तूर खरेदी रखडल्याने योजना बंद करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांत पुन्हा असंतोष उफाळून आला. मोठ्या प्रमाणात ओरड झाल्यानंतर राज्य शासनाने बाजारात तूर असलेल्या शेतकऱ्यांना टोकन दिले. या पद्धतीने २३ एप्रिल ते ६ जून पर्यंत खरेदी केली. या पूर्वी शासनाने नाफेड व एफसीआयच्या माध्यमातून येथील ३ हजार ३९८ शेतकऱ्यांकडून ४४ हजार ५५९.५८ क्विंटल तूर खरेदी केली. परंतु चुकारे मात्र २० एप्रिल २०१७ पर्यंत खरेदी केलेल्या तुरीचेच देण्यात आले. यामुळे तालुक्यातील जवळपास ४ हजार शेतकऱ्यांचे २६ कोटी ५० लाख रुपयांचे तुरीचे चुकारे शासनाकडे थकीत आहेत. शेती हंगाम सुरू झाला आहे. बँका कर्ज देत नाही, सावकारांनी शासन बडग्याची मोठी धास्ती घेतली आहे, अशा स्थितीत तुरीचे चुकारेच शेतकऱ्यांकरिता आधार असताना शासन सुद्धा दगा देत आहे. त्यामुळे आता पर्याय काय असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.