शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी हवे ३४५.९९ कोटी; २.५४ लाख हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान

By महेश सायखेडे | Published: September 06, 2022 4:40 PM

जिल्हा प्रशासनाने पाठविला शासनाला प्रस्ताव

वर्धा : यंदाच्या वर्षी जून महिन्यांत पावसाने दडी मारली. पण जुलै अन् ऑगस्ट महिन्यांत सैराट झालेल्या वरुणराजाची वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यात कोसळधार कायम राहिल्याने जिल्ह्यातील विविध महसूल मंडळांत अतिवृष्टीची वेळोवेळी नोंद घेण्यात आली. याच अतिवृष्टीमुळे २.५४ लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनीवरील उभ्या पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे सर्वेक्षण व पंचनाम्यांअंती पुढे आले आहे.

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तीन हेक्टरपर्यंत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या २ लाख ३२ हजार ६४६ इतकी असून त्यांना नियमानुसार शासकीय मदत देण्यासाठी ३४५.९९ कोटींची गरज असून तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविला आहे. आता शासनाकडून निधी केव्हा वितरित होतो याकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सर्वाधिक नुकसानग्रस्त शेतकरी समुद्रपूर तालुक्यात

वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील एकूण २ लाख ३२ हजार ६४६ शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. यात वर्धा तालुक्यातील ३३ हजार ११, सेलू तालुक्यातील २७ हजार ३८६, देवळी तालुक्यातील ३० हजार ३४९, आर्वी तालुक्यातील २६ हजार ३९८, आष्टी तालुक्यातील १७ हजार ३८७, कारंजा तालुक्यातील २४ हजार ३, हिंगणघाट तालुक्यातील ३६ हजार ५३३ तर समुद्रपूर तालुक्यातील ३७ हजार ५७९ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

हिंगणघाट तालुक्यातील उभ्या पिकांचे सर्वाधिक नुकसान

जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत जिल्ह्यात वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील एकूण २ लाख ५४ हजार ९४.४० हेक्टरवरील उभ्या पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. यात वर्धा तालुक्यातील ४०६९३.३३ हेक्टर, सेलू तालुक्यातील २३९६३.७० हेक्टर, देवळी तालुक्यातील ३७२९३.६० हेक्टर, आर्वी तालुक्यातील ३००७५.७७ हेक्टर, आष्टी तालुक्यातील १५०५५ हेक्टर, कारंजा तालुक्यातील २६३४३.३८ हेक्टर, हिंगणघाट तालुक्यातील ४५५८७.५२ हेक्टर तर समुद्रपूर तालुक्यातील ३५०८२.१० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

वाढीव दराप्रमाणे अपेक्षित तालुकानिहाय निधीवर्धा : ५५,५०,३७,२८८ रुपयेसेलू : ३२,६०,५७,२९६ रुपयेदेवळी : ५०,७२,२८,८०० रुपयेआर्वी : ४१,०१,४२,०९२ रुपयेआष्टी : २०,५२,८५,६०० रुपयेकारंजा : ३५,८२,६९,९६८ रुपयेहिंगणघाट : ६२,०८,२१,७४४ रुपयेसमुद्रपूर : ४७,७१,१६,५६० रुपये   

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी