शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सेवाग्रामातील ‘फ्रिडम रन’ मध्ये धावले ७५ युवक-युवती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 05:00 IST

देशभरात ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा होत असून पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांमध्ये ‘फ्रिडम रन’ चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वर्धा जिल्ह्यातील सेवाग्रामच्या महात्मा गांधी आश्रमाची निवड करण्यात आली. जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, स्पोर्ट्स असोसिएशन आणि नेहरु युवा केंद्राच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाचे खासदार रामदास तडस यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : देशाच्या स्वातत्र्य दिनाच्या ७५ व्या वर्षानिमित्त देशभरात ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा केला जात आहे. या अनुषंगाने भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने ‘फिट इंडिया, फ्रि डम रन २.०’ चे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सेवाग्राममध्येही चरखा गृहापासून सेवाग्रामपर्यंत ७५ युवक-युवती धावल्यात. खासदार रामदास तडस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या कार्यक्रमाला सुरुवात झाली.देशभरात ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा होत असून पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांमध्ये ‘फ्रिडम रन’ चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वर्धा जिल्ह्यातील सेवाग्रामच्या महात्मा गांधी आश्रमाची निवड करण्यात आली. जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, स्पोर्ट्स असोसिएशन आणि नेहरु युवा केंद्राच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाचे खासदार रामदास तडस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. देशासाठी युवक हा महत्त्वाचा असल्याने तो फिट राहणे आवश्यक आहे. प्रत्येकांना स्वत: च्या आरोग्यासाठी अर्धातास काढून फिटनेससाठी दिला पाहिजे. तेव्हाच इंडीया फिट राहील, असे मत खासदार तडस यांनी व्यक्त केले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी ललिता लेकुरवाळे, युवा केंद्राचे माजी समन्वयक संजय माटे, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, सतीश इंगोले, अनिल निमसडे, बडगिलवार, प्रवीण पेटे, नलिनी भोंगाडे, प्रितेश रामटेके, बाळकृष्ण हांडे आदी उपस्थित होते. राष्ट्रगीताने या उपक्रमाची सुरुवात झाली. खा. तडस यांनी हुतात्मा स्मारक परिसरात निसर्ग सेवा समितीच्यावतीने वृक्षारोपण केले. सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या यात्री निवास सभागृहात या कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी.आर.एन.प्रभू तर प्रमुख अतिथी म्हणून नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी शिवधन शर्मा, माजी समन्वयक संजय माटे, जिल्हा क्रीडा अधिकारी ललिता लेकुरवाळे, अनिल निमगडे, सतिश इंगोले, नलिनी भोंगाडे आदी उपस्थित होते. यावेळी यामध्ये सहभागी सर्वांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा युवा अधिकारी शिवधन शर्मा व संचालन जयश्री भोयर यांनी केले तर आभार अनिल निमगडे यांनी मानले. कार्यक्रमाकरिता नेहरु युवा केंद्राचे पर्यवेक्षक दयाराम रामटेके, अमोल चावरे, दिक्षांत टेंभरे, ऐश्र्वर्या भोयर, मृणाली बुडे तसेच जिल्हा क्रीडा कार्यालयाचे रवी काकडे यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमात ७५ गावातील ७५ युवक-युवतींचा सहभाग राहिला आहे. केंद्र सरकारच्या या उपक्रमाअंतर्गत २  ऑक्टोबरपर्यंत ७४४ जिल्ह्यांमध्ये ‘फ्रिडम रन’ होणार असल्याचे शिवधन वर्मा यांनी सांगितले.

 

टॅग्स :Sewagramसेवाग्रामRamdas Tadasरामदास तडस