शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
4
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
5
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
6
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
7
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
8
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
9
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
11
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
12
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
13
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
14
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
15
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
16
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
17
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
18
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
19
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
20
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश

वर्ध्यात दारूबंदी नावालाच; बनावट दारूच्या घोटाने महिनाभरात आठ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2022 16:47 IST

मागील वर्षभरात पोलीस विभागाने दोन कोटी रुपयांवर दारूसाठा जप्त करून तब्बल साडेतीन हजार दारू विक्रेत्यांना अटक केल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देवर्षभरात २ कोटींवर दारूसाठा केला जप्त

वर्धा : वर्धा जिल्ह्यात १९७४ मध्ये दारूबंदी झाली असली तरीही आजघडीला मोठ्या प्रमाणात दारूची विक्री वर्धा जिल्ह्यातच सुरू आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. विशेष म्हणजे वर्धा जिल्ह्या बनावट दारूमुळे गेल्या महिनाभरात आठ ते नऊ जणांची प्रकृती बिघडून त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे एक तर दारू खुली करा, अन्यथा कायमस्वरूपी तोडगा काढून दारू हद्दपार करा, अशी मागणी आता नागरिकांतून जोर धरू लागली आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होते. वर्धा जिल्ह्याला महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांचा वारसा लाभल्याने १९७४ मध्ये जिल्हा दारूबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून वर्धा जिल्हा ‘ड्राय डिस्ट्रिक्ट’ म्हणून ओळखला जातो. मात्र, आजघडीला असे वास्तव आहे की, याच जिल्ह्यात बंदी नसलेल्या जिल्ह्यापेक्षा जास्त प्रामाणात म्हणजेच कोट्यवधी रुपयांच्या दारूची उलाढाल होते. हेही मात्र तितकेच खरे.

मागील वर्षभरात पोलीस विभागाने दोन कोटी रुपयांवर दारूसाठा जप्त करून तब्बल साडेतीन हजार दारू विक्रेत्यांना अटक केल्याची माहिती आहे. इतकेच नव्हे, तर दारूची वाहतूक करणारी वाहनंही जप्त करण्यात आली आहेत. शहरासह जिल्ह्यात अगदी ठिकठिकाणी दारूची होणारी अवैध विक्री पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे, हे मात्र तितकेच खरे.

बनावट दारूचा कहर

जिल्ह्यात दारूबंदी असल्याने बनावट दारूचे विषही मोठ्या प्रमाणात विकले जाते. वर्ध्यात मध्य प्रदेश, दिल्ली आदी राज्यातील दारू विकली जात असल्याने मिळणाऱ्या दारूच्या बाटलीच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वर्ध्यात मोठ्या प्रमाणात बनावट दारूची सर्रास होणारी विक्री पाहता नागरिकांच्या आरोग्यावरही याचा परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

पोलिसांचेही हात ओलेच...

जिल्ह्यात दारू विक्री रोखण्यासाठी विविध महिला मंडळांच्या रणरागिणींनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली, वारंवार पोलीस विभागाकडे निवेदने देत पाठपुरावाही करण्यात आला. मात्र, तरीदेखील जिल्ह्यात दारूबंदी केवळ नावालाच उरल्याचे दिसून येत आहे. याला काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कारणीभूत असल्याने अख्ख्या पोलीस विभागाची प्रतिमा मलिन होत चालली आहे. त्यामुळे याकडेही लक्ष देत दारूबंदी विशेष पोलीस ठाण्याची निर्मिती करण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीalcohol prohibition actदारुबंदी कायदाwardha-acवर्धा