शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
2
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
3
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
4
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
5
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
6
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
7
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
8
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
9
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
10
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
12
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
13
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
14
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
15
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
16
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
17
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
18
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

विद्रोही साहित्य संमेलनासाठी एक मूठ धान्य, एक रुपया दान मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 4:37 PM

वर्ध्यातून केली सुरुवात : संमेलन ४ व ५ फेब्रुवारीला

वर्धा : ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची घोषणा झाल्यानंतर १७ वे अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनही नियोजित करण्यात आले आहे. ४ व ५ फेब्रुवारीला हे विद्रोही साहित्य संमेलन होणार असल्याने या संमेलनात सहभागी होणाऱ्या साहित्यप्रेमींना भोजन व साहित्यनगरी निर्माण करण्यासाठी, अनुषंगिक सुविधांसाठी धान्य आणि पैशाची गरज आहे. यासाठी आयोजकांनी ‘एक मूठ धान्य व एक रुपया सम्यक दान मोहीम’ सुरू केली आहे. आर्वी नाका परिसरातून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे.

सिद्धार्थ गौतम बुद्धांनी सम्यकदानाचा अर्थ समजावून सांगितला आहे. देणाऱ्याला अहंकार वाटता कामा नये व घेणाऱ्याला न्यूनगंड वाटता कामा नये, या संकल्पनेवर आधारित निधी गोळा करता आला पाहिजे, अशी भूमिका १७ व्या साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक डॉ. अशोक चोपडे यांनी मांडली. तसेच जनतेच्या क्रांतिकारी पर्यायी साहित्य-संस्कृतीच्या जागरात सर्वांनी तन-मन-धनाने मदत करून सर्व बहुजन, आदिवासी, भटके, महिला, शोषित, वंचित, पीडित व सर्वहारा घटकांचे हे संमेलन यशस्वी करा, असे आवाहनही त्यांनी केले. 

संमेलनाला मिळणारा शासकीय निधी बंद करावा - नीतेश कराळे

सरकारी पैसा साहित्य संमेलनावर खर्च न करता विद्यार्थी, शेतकरी, कष्टकरी व कामगार आदींसाठी खर्च करावा. शासनाकडून मिळणारा निधी बंद करून थेट विद्रोही साहित्य चळवळीसारखे जनतेत जाऊन मदत मागावी. साधे जेवण आणि समतावादी साहित्य व मूल्य संस्कृतीचा जागर आणि विचारांची मेजवानी हे विद्रोहीचे वैशिष्ट्य आहे. त्यासाठी एक मूठ धान्य व एक रुपया सम्यक दान करावे, असे मत अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष नीतेश कराळे यांनी मांडले.

नुसता कल्ला म्हणजे विद्रोह नव्हे : चंद्रकांत वानखडे

वर्धा येथे ४ व ५ फेब्रुवारी रोजी अ. भा. विद्रोही साहित्य संमेलन होऊ घातले आहे. विद्रोही साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून नुसता कल्ला झाला म्हणजे विद्रोह होय, हा विचार मला मान्य नाही. शाहू, फुले, आंबेडकर यांच्यासह गांधीही विद्रोहाचे प्रतिक आहे, ही भूमिकाच आपण स्वीकारली असून, याच भूमिकेतून साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून मी विचार व्यक्त करणार आहोत. विद्रोहीवाद्यांना गांधी तसा मान्य होत नाही. मात्र, मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. जमिनीच्या पोटातून उगविणारा अंकुर जसा परिश्रमाने वर येतो, त्याचे हे परिश्रमही मी विद्रोह मानतो. त्यामुळे विद्रोही साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर यावेळी गांधीही असतील, अशी भूमिका विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ संपादक चंद्रकांत वानखडे यांनी व्यक्त केली. संमेलनापूर्वी त्यांनी सोमवारी वर्धा येथील ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली, यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत ज्येष्ठ लेखक संतोष अरसोड हेही उपस्थित होते.

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिकwardha-acवर्धा