शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

आचार्य विनोबा भावे हे असामान्य प्रतिभेचे धनी होते

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 3:45 PM

दिनविशेष : आज १२९ वी जयंती, महिलांना आध्यात्मिक क्षेत्रात दिली नवी दिशा

दिलीप चव्हाण लोकमत न्यूज नेटवर्क सेवाग्राम : आचार्य विनोबा भावे असामान्य प्रतिभेचे धनी होते. आध्यात्मिक परंपरेतील महत्त्वाचा दुवा असून, महिलांना या क्षेत्रात नवीन दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे.

स्वातंत्र्य चळवळीतील पहिले सत्याग्रही म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी त्यांची निवड केली होती. आईला संस्कृतमधील गीता समजत नव्हती, म्हणून मराठीत गीताई लिहून आईला समर्पित केली. अशा महान विचारवंत आणि भूदान चळवळीच्या कार्यातून सामान्य गोर गरीबांच्या प्रश्नांमध्ये हात घातला. आचार्य विनोबा भावे यांची ११ सप्टेंबर रोजी १२९ वी जयंती असून, त्यानिमित्ताने त्यांचे स्मरण होणे आवश्यक आहे. नव्या पिढीला त्यांची ओळख होणे काळाची गरज आहे. आचार्य विनोबा भावे यांना अनेक भाषा अवगत होत्या. गीता समजून घेण्यासाठी ते संस्कृत भाषा शिकले. अध्यात्माचे जेवढे अध्ययन केले, तेवढेच सामाजिक शास्त्रांचे सुद्धा. त्यांचे चिंतन केवळ शाब्दिक नव्हते, तर खऱ्या अर्थाने ते कर्मयोगाच्या कठिण साधनेतून तावून सुलाखून निघाल्याने आजही त्यांचे विचार, कार्य आणि साहित्य मानव जातीसाठी दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरणारे आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, अशी म्हण प्रचलित आहे. संत विनोबा यात बरोबर बसतात. सामान्य कुटुंबातील पण संस्कारमय वातावरणात ते घडले. ते बालपणापासून हुशार होते. आई आध्यात्मिक, तर वडिलांची विज्ञानवादी विचारसरणी असली, तरी विनोबा मात्र सदैव आईचाच पक्ष घेत असे. बालवयातच ब्रम्हचारी राहण्याचा त्यांनी संकल्प केला होता. तारुण्यात शिक्षणासाठी पायपीट केली. संघर्ष करावा लागला. देशातील स्वातंत्र्य चळवळ, राष्ट्रसेवा आणि अध्यात्माची ओढ मात्र कायमच राहिली. 

महाराष्ट्र धर्म' पत्रिकेमुळे त्यांची नवीन ओळख लोकांना झाली. वयाच्या १३ व्या वर्षी ज्ञानेश्वरीचे भाषांतर वाचले. विद्यालयात शिकताना ज्ञानेश्वरी वाचून काढली, पण ती साहित्य दृष्टीने. विनोबा म्हणतात 'गांधीजींच्या सत्संगात मला गीतेचा अर्थ कळला' गीता हिंदू धर्माचा ग्रंथ असला, तरी तो सांप्रदायिक नाही, असे विनोबांना वाटत होते. विज्ञानातून विकास हा विनाशकारी ठरत आहे. आत्मज्ञानाचा अंकुश आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आज जगात जी युद्ध परिस्थिती निर्माण झाली त्यावरून याची प्रचिती येते. विनोबांच्या जीवनाला कलाटणी मिळाली ती पोचमपल्ली येथील घटनेतून आणि जमिनीची पुढे भूदान ही संकल्पना अस्तित्वात आली. यासाठी तब्बल १३ वर्षे हा यज्ञ अखंड ठेवला. यात ४८ लाख एकर जमीन मिळाली. जवळपास ७० हजार किमीची पदयात्रा यासाठी करावी लागली. पवनार येथे त्यांचा परंधाम आश्रम धाम नदिच्या तिरावर आहे. आश्रमात खोदकाम करीत असतानाच श्रीरामाची मूर्ती मिळाली, तसेच अन्य काही भग्नावस्थेत मूर्ती आढळून आल्याने त्यांची पण प्राणप्रतिष्ठा केली. आश्रमात देशातील विविध भागांतून आलेल्या भगिनी असून, आध्यात्मिक स्तरावर साधनेचा प्रयोग करावा, अशी त्यांची इच्छा होती. विनोबांच्या प्रेरणेने गीताई मिशनची स्थापना केली. आश्रमाला भेट देणाऱ्यांची संख्या कमी नाही. त्यांचे विचार विज्ञान व तंत्रज्ञान युगातही दिशा देण्याचे काम करीत असल्याने आजही मोठ्या संख्येने पर्यटक आणि अभ्यासक आश्रमाला भेट देत असतात.

टॅग्स :wardha-acवर्धा