शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

नझुल भूमापकाने गटकले ‘ऑलआऊट’; आत्महत्येच्या प्रयत्नाने खळबळ, हिंगणघाट येथील प्रकरण

By आनंद इंगोले | Updated: October 31, 2023 19:27 IST

भूमिअभिलेख कार्यालयात चौकशीचा ससेमिरा

हिंगणघाट (वर्धा): येथील भूमिअभिलेख कार्यालयाबद्दल नागरिकांच्या असलेल्या तक्रारीवरुन सोमवारपासून चौकशीचा ससेमिरा सुरु झाला आहे. आज भूमीअभिलेख उपसंचालक नागपुरची चमू व उपविभागीय अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु असतानाच येथील नझुल भूमापकाने बसस्थानक जवळ आॅलआऊट मॉस्किटो विषारी द्रव्य प्राशन केल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना दुपारी ४ वाजतादरम्यान घडली असून तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्रशांत बबनराव येते (५२) असे भूमापकाचे नाव आहे. येथील भूमी अभिलेख कार्यालयात आमदार समीर कुणावर यांनी आकस्मिक भेट देवून कामकाजाचा आढावा घेतला. यात कार्यालयीन दफ्तर दिरंगाई आणि कर्मचाऱ्यांच्या गैरव्यवहारावरुन आमदारांनी थेट महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संपर्क साधून कार्यालयातील प्रकार त्यांच्यासमोर कथन केला. याचीच दखल घेत  भूमी अभिलेख उपसंचालक शिंदे यांनी तीन कर्मचाºयांना या कार्यालयात पाठवून प्रकरणाचा निपटारा करण्याचे निर्देश दिले.

भूमी अभिलेख उपसंचालक कार्यालयातील उपअधीक्षक सतीश पवार तसेच वरिष्ठ लिपिक मनिष जांगळे व मृणाल द्र्रवेकार हे दोन दिवस येथे थांबून नागरिकांचे समस्या जाणून घेणार असून प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करणार आहे. तसेच उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले या सुद्धा या कार्यालयातील गैरप्रकराची चौकशीकरुन सात दिवसात शासनाकडे अहवाल पाठविणार आहे. त्यामुळे भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. याच दरम्यान येथील भूमापक येते यांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याने खळबळ उडाली. त्यांना प्रारंभी उपजिल्हा रुग्णालयात तर नंतर सेवाग्राम येथे दाखल करण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.अधिकाऱ्यांनी जाणल्या समस्याभूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांबद्दल नागरिकांच्या गेल्या अनेक दिवसापासून तक्रारी होत्या. येथे मोठ्या प्रमाणावर दलालामार्फत कामे होत असून नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याच्याही तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. याची दखल घेऊनच आमदार समीर कुणावार यांनी भूमी अभिलेख कार्यालय गाठले होते. तेव्हा त्यांनी अनेक गैरप्रकार निदर्शनास आल्याने त्यांनी सुत्रे हलविली. आज ते उपअधीक्षक सुनील बन यांच्या चौकशी चमूसह कार्यालयात दाखल झाले. अधिकाऱ्यांनी उपस्थितांच्या व्यथा जाणून घेतल्या. या कार्यालयाकरिता येत्या १५ दिवसात पूर्णवेळ उपअधीक्षक दिला जाईल तसेच चौकषी समितीच्या अहवालावरुन दोषीवर कारवाई होणार, असा विश्वास आमदार समीर कुणावार यांनी बोलून दाखविला.