शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वर्धा शहरावर कृत्रिम जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 05:00 IST

वर्धा नगरपालिका प्रशासन येळाकेळी तसेच पवनार येथील धाम नदीच्या पात्रातून दररोज २७ द.ल.ली. पाण्याची उचल करते. उचल करण्यात आलेल्या पाण्यावर पवनार तसेच वर्धा शहरातील आयटीआय टेकडीवरील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केल्यावर त्या पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा वर्धा शहरातील १६ हजार कुटुंबांना करते. समृद्धी महामार्गाच्या कामादरम्यान येळाकेळी येथून पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  येळाकेळी तसेच पवनार येथील धाम नदीच्या पात्रातून पाण्याची उचल करून वर्धा शहरातील १९ प्रभागातील नागरिकांना वर्धा नगरपालिका प्रशासन पाणी पुरवठा करते. परंतु, रस्त्याच्या कामादरम्यान येळाकेळी-वर्धा आणि पवनार-वर्धा या दोन्ही मुख्य जलवाहिनी फुटल्या. या दोन्ही जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी ४८ तासांचा कालावधी लागणार असून पुढील दोन दिवस वर्धेकरांना पाणी पुरवठा होणार नाही. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा नागरिकांनी काटकसरीनेच वापर करावा, असे आवाहन न.प.च्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.वर्धा नगरपालिका प्रशासन येळाकेळी तसेच पवनार येथील धाम नदीच्या पात्रातून दररोज २७ द.ल.ली. पाण्याची उचल करते. उचल करण्यात आलेल्या पाण्यावर पवनार तसेच वर्धा शहरातील आयटीआय टेकडीवरील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केल्यावर त्या पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा वर्धा शहरातील १६ हजार कुटुंबांना करते. समृद्धी महामार्गाच्या कामादरम्यान येळाकेळी येथून पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली. तर वर्धा-दत्तपूर या मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान पवनार येथून वर्धा शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली. यामुळे पुढील दोन दिवस वर्धा शहरातील नागरिकांना नळाद्वारे पाणी पुरवठा होणार नाही. या दोन्ही जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर केले जात असले तरी ते काम पूर्णत्त्वास जाण्यासाठी किमान ४८ तासांचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आले.

या परिसरातील नळाला येणार नाही पाणी

- मुख्य जलवाहिनी फुटल्याने वर्धा शहरातील साने गुरुजीनगर, गांधीनगर, सुदामपुरी, यशवंत कॉलनी, खडसे कॉलनी, मानस मंदिर, केळकरवाडी, आर्वी नाका परिसर, गजानननगर, म्हाडा कॉलनी, शास्त्री चौक, गौरक्षण वार्ड, भामटीपुरा, विग्नहर्तानगर, रामनगर, हिंदनगर, गोटेवादी, बापाटवाडी, पोतदार बगीचा, जैन मंदिर, कृष्णनगर, गुजराती भवन परिसर, मालगुजारीपुरा, इंदिरा मार्केट, वंजारी चौक, धंतोली चौक, राधानगर, साबळे प्लॉट, बचलर रोड, गोंड प्लॉट, हनुमाननगर, शिवनगर, स्टेशन फैल, दयालनगर, मांगगारुडी मोहल्ला, तारफैल, झाकीर हुसैन कॉलनी, एम.जी. मोहल्ला, सिव्हील लाईन, मोहिनीनगर, शिवाजी चौक परिसर, ठाकरे मार्केट, गोलबाजार, कच्छी लाईन, मुख्य बाजार पेठ, महादेवपुरा, लक्ष्मीनगर, स्नेहलनगर, सेवाग्राम रोड, बेद ले-आऊट, हिमालाय विश्व वसाहत, नागपूर रोड, महिला आश्रम, फुलफैल, आनंदनगर, इतवारा, लहानुजीनगर या भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

 

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाई