शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

नागरिकत्व कायद्याविषयी भ्रम पसरवून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 06:00 IST

पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तान या भारताच्या सीमेला लागून असलेल्या देशांमधील अल्पसंख्य नागरिक जे अत्याचार व अपमान सहन करीत आले आहे, अश हिंदू, शीख, इसाई, बुद्ध, पारसी, जैन या धर्मातील घटकांना सरकार नागरिकत्व देत असतानाही त्याविरुद्ध रणकंदन करून मतपेटीवर डोळा ठेवण्याचे काम कॉँग्रेस व या कायद्याला विरोध करणारे सर्व पक्ष करीत असल्याची माहिती खा. रामदास तडस यांनी दिली.

ठळक मुद्देरामदास तडस यांचा आरोप । संवाद अभियानाअंतर्गत मांडली भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मोदी सरकारने संसदेच्या हिवाळी अधिवेशनात नागरिकत्व कायद्याचे विधेयक पारित करून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयाने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने त्यांनी हे विधेयक मुस्लिमांसाठी किती घातक आहे, हे पटवून देण्याचा खोटा व केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना फूस देत आंदोलनात उतरवून देश पेटविण्याचे काम विरोधकांनी केले असून या नागरिकत्व कायद्याचा भारतात पूर्वीपासून वास्तव्य करणाऱ्या भारतीय नागरिकांवर व धर्मावर परिणाम होणार नाही. देशाची फाळणी दुर्दैवाने धर्माच्या आधारावर झाली.पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तान या भारताच्या सीमेला लागून असलेल्या देशांमधील अल्पसंख्य नागरिक जे अत्याचार व अपमान सहन करीत आले आहे, अश हिंदू, शीख, इसाई, बुद्ध, पारसी, जैन या धर्मातील घटकांना सरकार नागरिकत्व देत असतानाही त्याविरुद्ध रणकंदन करून मतपेटीवर डोळा ठेवण्याचे काम कॉँग्रेस व या कायद्याला विरोध करणारे सर्व पक्ष करीत असल्याची माहिती खा. रामदास तडस यांनी दिली. संवाद या अभियानंतर्गत खासदार रामदास तडस नागरिकत्व कायद्यावर बोलत होते.भारत, पाकिस्तान व बांगलादेश या तीन देशाची निर्मिती झाली तेव्हा दोन्ही देश आपल्या कक्षेतील अल्पसंख्यकांना संरक्षण देतील, असे करारानुसार ठरले होते. त्यासंदर्भात नंतर भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खान यांच्यात करारही झाला होता. पण पाकिस्तानने त्या कराराचे प्रामाणिक पालन तेव्हाही केले नाही आणि आजही ते होत नाही, हे वेळोवळी सिद्ध झाले आहे. त्यामुळेच त्या देशातील अल्पसंख्यकांवर अत्याचार होत गेले. हा कायदा पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तान येथील पीडित अल्पसंख्य हिंदू, शीख, बौद्ध, ईसाई, जैन, पारशी यांना नागरिकत्व देण्याचा कायदा आहे, कुणाचेही नागरिकत्व काढून घेणे हे या कायद्यामध्ये अंतर्भूत नसून विरोधक विनाकारण भ्रम निर्माण करताना दिसत आहेत, असेही तडस म्हणाले.महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, काँग्रेस पक्षाने त्या काळात राष्ट्रीय अधिवेशनात केलेला ठराव अशा अनेक दिगजांनी पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तान येथील पीडित अल्पसंख्य हिंदू, शीख, बौद्ध, ईसाई, जैन, पारशी यांच्याबद्दल चिंता व्यक्त करून भारतात परतण्याचे आवाहन केले होते. त्यांना सन्मानाने नागरिकत्व बहाल करण्यात यावे, अशी मागणी केली होती. आज इतिहासातील या घटनांवर साधी चर्चा होताना दिसत नाही, ही शोकांतिकाच म्हणावी, असे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये बिल मंजूर करत असताना विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्यांवर चर्चा करून समाधानकारक उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तान येथे बहुसंख्य असलेल्या मुस्लिम समाजातील नागरिकांना भारतात नागरिकत्व का देता येणार नाही, हेदेखील केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी संसदेत स्पष्ट केले आहे.नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ व ठफउ हे दोन्ही वेगवेगळे विषय असून भारतात वास्तव्य करणाºया कुठल्याही धर्माच्या भारतीय नागरिकांवर अन्याय होणार नाही, हेदेखील केंद्र सरकारच्या वतीने वेळोवेळी स्पष्ट करण्यात आले आहे. काही राजकीय पक्ष अवैधपणे वास्तव्य करणाºया घुसखोरांना केवळ राजकीय फायद्यासाठी मदत करून त्यांनासुद्धा नागरिकत्व देण्याची मागणी करताना दिसत आहेत, हे देखील अत्यंत चुकीचे असून याचे समर्थन करताच येणार नाही, असेही खासदार तडस यांनी स्पष्ट केले.हिंसाचाराला समर्थन नाहीच!देशातील शासकीय मालमत्ता, रेल्वे, रेल्वेस्थानक व बसगाड्यांची जाळपोळ, रेल्वेचे रुळ उखडून टाकणे, स्थानकाचे नुकसान करणे, निष्पाप नागरिकांना मारहाण करणे तसेच देशातील काही विद्यार्थ्यांना फूस देत आंदोलनात उतरवून देश पेटवण्याचे काम विरोधक करीत असून या घटनांचे समर्थन करताच येणार नाही, काही ठिकाणी पोलिस दलावर हल्ला करण्यात आला असून त्याचासुद्धा निषेध करावा तितका कमीच आहे, असे रामदास तडस म्हणाले.येणाºया काळात सर्व समाजांना व घटकांना एकत्र करून नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ बद्दल शांतिप्रिय मार्गाने समाजात जनजागृती करण्याचा भारतीय जनता पक्षाचा मानस असून या कार्यात सर्वांनी सहकार्य करावे व विरोधकांनी निर्माण केलेला भ्रम दूर करावा, असे आवाहन रामदास तडस यांनी नागरिकांना केले आहे.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस