शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
5
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
6
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
7
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
8
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
9
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
10
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
11
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
13
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
14
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
15
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
16
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
17
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
18
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
19
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
20
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ

गावागावांत करणार पुरोगामी विचारांचा जागर : अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 6:19 PM

महाराष्ट्र बचाओ अभियान: राजकीय साक्षरता करण्यासाठी बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शाखेद्वारे राजकीय साक्षरतेसाठी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या 'संविधान बचाओ, महाराष्ट्र बचाओ' या अभियानाची संयुक्त बैठक स्थानिक राष्ट्रीय युवा संगठन कार्यालयात घेण्यात आली. येत्या ऑगस्टपासून या अभियानाची सुरुवात होत असून, सर्वसमावेशक नियोजनाबाबत विविध परिवर्तनवादी व समविचारी सामाजिक राजकीय संघटनांशी या बैठकीत चर्चा केली.

समाजात राजकीय साक्षरता रुजविण्याच्या उद्देशाने अ. भा. अंनिसद्वारे सेवाग्राम येथे नुकतीच वक्ता प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत महाराष्ट्रातील सुमारे ६० वक्ते सहभागी झाले होते. भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांसह आपली कर्तव्ये, संवैधानिक मूल्ये आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यासंदर्भात नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी या कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यात आले. भारताचे संविधान आणि स्वातंत्र्याचा राजकीय इतिहास याबाबत समाजमनात पसरलेले गैरसमज दूर करण्यासाठी हे अभियान आहे. नवमतदार युवक, युवतींनी उत्तम नागरिक बनण्यासाठी संविधान समजून घेण्याची आवश्यकता असून, त्यासाठी महाविद्यालयीन स्तरावरही संपूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम राबविला जाणार आहे. जिल्ह्यातही विविध महाविद्यालयांत 'भारतीय संविधान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन' या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय, ग्रामीण आणि शहरी भागात लहान व मोठ्या जाहीर जनजागर सभांचे आयोजन 'अंनिस'द्वारे करण्यात येणार असून, त्यासाठी विविध सामाजिक पुरोगामी संघटनांनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. बैठकीला अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय इंगळे तिगावकर, जिल्हाध्यक्ष हरीश इथापे, जिल्हा महिला शाखा संघटक डॉ. सुचिता ठाकरे, भारत जोडो अभियानचे विदर्भ संयोजक अविनाश काकडे, सत्यशोधक महिला प्रबोधिनीच्या प्रा. नूतन माळवी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, माकपा नेते यशवंत झाडे, आम आदमी पक्षाचे प्रमोद भोमले, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. सुभाष खंडारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा. खलील खतीब, संदीप किटे, प्रदीप वानखेडे, राष्ट्रवादी किसान सभेचे संजय काकडे, किसान अधिकार अभियानचे सुदाम पवार, विनेश काकडे, राष्ट्रीय युवा संघटनचे प्रशांत नागोसे, दिनेश प्रसाद, भारतीय लोकशाही अभियानचे अतुल शर्मा, सुषमा शर्मा, मालती देशमुख आदी उपस्थित होते.

गावागावांत करणार जनजागृती...संविधान वाचविण्यासाठी महाराष्ट्र बचाव हे अभियान राबविण्यात येणार आहे, यासाठी जिल्ह्यातील गावागावांत बैठक घेण्यात येणार असून जनजागृती केली जाणार आहे. नुकतीच बैठक पार पडली असून येत्या काही दिवसांत राजकीय साक्षरता करण्यासाठी बैठकींचे आयोजन केले जाणार आहे. 

टॅग्स :wardha-acवर्धा