शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

बाबासाहेबांच्या ‘त्या’ स्मृती देतात अनेकांना प्रेरणा

By admin | Published: April 14, 2016 2:48 AM

देशाच्या स्वातंत्र्यासह मानवतावादाला महत्त्व देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांची पहिली चर्चा सेवाग्राम येथे झाली.

तो दगड ठरला भेटीचा साक्षीदार : सेवाग्राम येथे महामानव आणि राष्ट्रपित्याची चर्चादिलीप चव्हाण सेवाग्रामदेशाच्या स्वातंत्र्यासह मानवतावादाला महत्त्व देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांची पहिली चर्चा सेवाग्राम येथे झाली. या चर्चेत डॉ. आंबेडकर यांनी सेवाग्राम येथील दलित बांधवांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला. या गावात जाण्यासाठी सायंकाळ झाल्याने त्यांनी खुल्या मैदानात एका दगडावर बसून समाजबांधवांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले. तो दगड आजही येथे कायम असून त्या स्मृती अनेकांना प्रेरणादायी ठरत आहेत.डॉ. बाबासाहेबांच्या स्पर्शाने पावन झालेल्या या दगडाचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. शिवाय येथे बसून त्यांनी दिलेला संदेश का फलकावर लिहून तो सर्वांना कळावा, यासाठी हा फलक दर्शनी भागात लावण्यात आला आहे. येथे येणारे या स्थळी प्रेरणा मिळत असल्याचे बोलून दाखवितात. त्या मैदानात उपस्थित गावातील काही नागरिक आजही त्या क्षणाची साक्ष देतात. डॉ. आंबेडकर १ मे १९३६ रोजी सेवाग्राम येथे आले होते. बापुकुटीत महात्मा गांधी यांची भेट घेत त्यांच्यात चर्चा झाली. या गावातील समाज बांधवांमध्ये आपल्या हक्काकरिता लढण्याची जनजागृती व्हावी, यासाठी बाबासाहेबांनी मूळ गावात जाऊन संवाद साधला. शिक्षणाची कास धरण्याचे केले होते आवाहनसेवाग्राम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सेवाग्राम या मूळ गावात जाऊन शिक्षणाची कास धरण्याचे आवाहन समाजबांधवांना केले होते. ज्या ठिकाणी बाबासाहेब बसले होते, ती जागा व दगड सौंदर्यीकृत करून त्यांच्या स्मृती आजही जोपासल्या जात आहे. महात्मा गांधी दलितांवर होत असलेल्या अन्यायामुळे अस्वस्थ होते. याच काळात डॉ. आंबेडकर यांचा या अन्यायाविरोधात लढा सुरू होता. दोन्ही महात्म्यांचे विचार एक असले तरी काही बाबतीत तात्विक वाद होते. या दोघांत चर्चा व्हावी, या उद्देशाने १ मे १९३६ रोजी जमनालाल बजाज यांनी डॉ. आंबेडकर यांची भेट आश्रमात बापूंशी घडवून आणली. येथील बौद्ध विहाराच्या परिसरातील ही जागा आता समाज बांधवांसाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजाकरिता प्रेरणास्थान बनली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या चर्चेचे साक्षीदार पांडुरंग गोसावी, नामदेव गोसावी, आत्माराम ताकसांडे तो क्षण आपल्या डोळ्यांत आजही साठवून आहेत.