शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

बाहेर जिल्ह्यातून दूध, फळे, भाजीपाला आणण्यास बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 05:00 IST

भाजीपाला विक्रीच्या केंद्रांवर नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून यापूर्वीच भाजी बाजार इतर ठिकाणी हलविण्यात आले आहेत. शिवाय तेथे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे. भाजीपाला विक्रेता हे अनेक नागरिकांच्या संपर्कात येत असल्याने त्यांची आरोग्य तपासणीही करण्यात आली. त्यानंतर ६ व ७ एप्रिलला भाजीबाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश : १४ एप्रिलपर्यंत लागू राहणार बंधने

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागपूर, यवतमाळ तसेच अमरावती या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढले आहेत. परंतु, सध्यास्थितीत वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. म्हणजेच ‘सेफझोन’ असलेल्या वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होऊ नये या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन सध्या जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात येणारा भाजीपाला, दुध, फळ तसेच सदर जीवनावश्यक साहित्य वर्धा जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात पाठविण्यावर १४ एप्रिलपर्यंत बंदी घालण्याचा निर्णय जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी घेतला आहे.भाजीपाला विक्रीच्या केंद्रांवर नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून यापूर्वीच भाजी बाजार इतर ठिकाणी हलविण्यात आले आहेत. शिवाय तेथे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे. भाजीपाला विक्रेता हे अनेक नागरिकांच्या संपर्कात येत असल्याने त्यांची आरोग्य तपासणीही करण्यात आली. त्यानंतर ६ व ७ एप्रिलला भाजीबाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर आता ८ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात भाजी, दुध, मांस व फळ आणण्यास तसेच वर्धा जिल्ह्याबाहेर सदर जीवनावश्यक वस्तू पाठविण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या सात दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील भाजीबाजार, फळ व मांस विक्रीचे दुकान दिलेल्या वेळेत सुरू राहणार आहे. कुठल्याही परिस्थित नागरिकांनाची गैरसोय होणार नाही याची दक्षताही जिल्हा प्रशासनाकडून घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यात भाजीपाल्याचे उत्पादन मुबलकवर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यात ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सोय आहे असे शेतकरी भाजीपाल्याचे पीक घेत आहेत. सध्या अनेक शेतकरी विविध भाजीपाला वर्गीय पिकांची नियमित तोड करून तो नाशवंत शेतमाल बाजारपेठेपर्यंत आणत आहेत. तर काहींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. जिल्ह्यात सध्या टमाटर, चवळी, वांगी, मिरची, वाल, काकडी, भेंडी, ढेमस, पालक, संभार, कांदा, शेवगा, पत्ताकोबी व फुलकोबीचे उत्पादन होत असून हा शेतमाल शेतकऱ्यांच्या शेताच्या धुºयावरून थेट बाजारपेठेपर्यंत कसा येईल यासाठीही विशेष प्रयत्न होणार असल्याचे सांगण्यात आले.कृषी विभागाच्या खांद्यावर जबाबदारीजिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार इतर जिल्ह्यातील भाजीपाला वर्धा जिल्ह्यात येणार नसला तरी वर्धा जिल्ह्यातील विविध भागात उत्पादित होत असलेला भाजीपाला नियमित बाजारपठेपर्यंत कसा पोहोचेल याची जबाबदारी कृषी विभागावर राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनातील खात्रीदायक सूत्रांनी सांगितले. त्या अनुषंगाने मंगळवारी बैठकही पार पडली.शहरात ११ ठिकाणी मिळणार भाजीपालावर्धा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच गर्दी टाळण्यासाठी सुरूवातीला केवळ दोनच ठिकाणी भाजीबाजार भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आता मानस मंदिर येथील मैदान, सानेगुरुजीनगर भागातील साई मंदिर परिसर, केळकरवाडी भागात डॉ. वाणी यांच्या घराजवळील मैदान, गांधीनगर भागात विकास विद्यालयाचे मैदान, लक्ष्मीनगर येथे हनुमान मंदिर परिसर, महादेवपुरा भागात महादेव मंदिर परिसर तसेच बजरंग विहीर, स्वावलंबी विद्यालयाचे मैदान, रामनगर भागात सर्कस मैदान, कृष्णनगर येथे गाडगेबाबा मठ शेजारील मैदान, बोरगाव (मेघे) परिसरात जिनिंग फॅक्टरी मैदान तसेच पुलफैल भागातील लालालचपत रॉय शाळेच्या मैदानावर भाजीबाजाराची व्यवस्था करण्यात आली असल्याचे वर्धा नगर पालिकेच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे. सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करूनच नागरिकांनी भाजीची खरेदी करावी, असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.नागपूर, यवतमाळ व अमरावती या वर्धा जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळले आहे. मात्र, वर्धा जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. कोरोनाला अटकाव घालण्याच्या उद्देशाने पुढील सात दिवस वर्धा जिल्ह्यात भाजीपाला, दूध व फळे इतर जिल्ह्यातून आणण्यास तसेच सदर जीवनावश्यक वस्तू वर्धा जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात निर्यात करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. हा निर्णय थोडा कठोर असला तरी नागरिकांची गैरसोय होणार नाही याचीही दक्षता घेतली जाणार आहे.- विवेक भिमनवार, जिल्हाधिकारी, वर्धा.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीvegetableभाज्या