शहरं
Join us  
Trending Stories
1
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
2
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
3
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
4
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
5
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
6
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
7
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
8
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
9
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
10
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
11
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
13
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
14
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
15
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
16
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
17
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
18
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

खरीप हंगामातील पीककर्ज वाटपात बँकांनी गाठले अर्धशतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2021 10:28 PM

ग्रामीण भागात १५ ते २० गावांचे व्यवहार लगतच्या मोठ्या गावातील बँकेवरच अवलंबून असतात. संचारबंदी आणि वाहतुकीची साधनेही या काळात उपलब्ध न झाल्याने कर्ज प्रकरणे दाखल करण्यातही खोडा निर्माण झाला होता. सेकंड अनलॉकनंतर कर्ज वाटप प्रक्रियेला गती आली आहे. शेतकऱ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत ४२४ कोटी ५१ लाखांचे कर्जवाटप झाले असून बँकांनी निम्मे उद्दिष्ट गाठले  आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावेळीही करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे खरीप हंगामातील पीककर्ज वितरण  प्रक्रिया मध्यंतरीच्या काळात मंदावली होती. अनलॉकनंतर कर्जवाटपाला गती आली असून ३१ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील ३६ हजार ५३४ शेतकऱ्यांना ४२४ कोटी ५१ लाख रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. कर्जवाटपाची ही टक्केवारी ५० टक्के आहे.जिल्ह्यातील बँकांना  ८५० कोटी रुपये खरीप पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. जिल्ह्यात ४ लाख ३३ हजार ८५० हेक्टरवर खरिपातील पिकांची पेरणी करण्यात आली. खरीप हंगाम आता उलटण्याच्या मार्गावर असून १ ऑक्टोबरपासून रब्बी हंगामाकरिता पीककर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू होणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागीलवर्षी तब्बल पाच महिने लॉकडाऊन होते. यावेळीही मार्च महिन्यापासून कोरोनाने कहर केला. एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या आणि मृत्युसंख्येने अक्षरश: तांडव घातले. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून कठोर निर्बंध घालण्यात आले होते. शासकीय कार्यालयात १५ टक्के उपस्थितीचा नियम लागू करण्यात आला होता. ८ मे पासून १८ मे पर्यंत कठोर निर्बंध लागू करण्यात आल्याने या काळात बँकांदेखील बंद होत्या. ग्रामीण भागात १५ ते २० गावांचे व्यवहार लगतच्या मोठ्या गावातील बँकेवरच अवलंबून असतात. संचारबंदी आणि वाहतुकीची साधनेही या काळात उपलब्ध न झाल्याने कर्ज प्रकरणे दाखल करण्यातही खोडा निर्माण झाला होता. सेकंड अनलॉकनंतर कर्ज वाटप प्रक्रियेला गती आली आहे. शेतकऱ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत ४२४ कोटी ५१ लाखांचे कर्जवाटप झाले असून बँकांनी निम्मे उद्दिष्ट गाठले  आहे. 

१ ऑक्टोबरपासून रब्बीचे कर्जवितरण- खरीप हंगामातील पीककर्ज वितरणाने अर्थशतक गाठले आहे.  खरीप हंगाम आता उलटण्याच्या मार्गावर आहे. १ ऑक्टोबरपासून रब्बी हंगामाकरिता कर्ज वितरणाची प्रक्रिया सुरू होणार असल्याने प्रकरणे दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

जिल्ह्यातील एकूण खातेदार शेतकरी ३६५३४

मागीलवर्षीपासून कोरोनाचे संकट घोंगावत आहे. यावेळीही हे संकट कायम असल्याने मध्यंतरी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कर्ज वितरणावर परिणाम झाला. अनलॉकनंतर बँकांचे कामकाज पूर्वपदावर आले असून कर्जवाटपालाही गती आली आहे. खरीप हंगामातील कर्जवाटपाचे निम्मे उद्दिष्ट गाठण्यात आले आहे.-वैभव लहाने, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक.

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्जbankबँक