शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बंधाऱ्यांवरील खर्च व्यर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:35 IST

पाणी अडवा, पाणी जिरवा या उद्देशालाच सध्या हरताळ फासल्याचे बोरनदीवरील बंधाºयांची स्थिती पाहिल्यावर दिसून येते. इतकेच नव्हे, तर नदीवर बंधारे बांधूनही २० वर्षांपासून संबंधितांच्या दुर्लक्षित कारभारामुळे पाणीच अडत नसल्याने बंधाºयांवरील झालेला खर्च व्यर्थ ठरत आहे.

ठळक मुद्देबोर नदी : २० वर्षांपासून पाणी अडलेच नाही, लघुसिंचनची उदासिनता

विजय माहुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : पाणी अडवा, पाणी जिरवा या उद्देशालाच सध्या हरताळ फासल्याचे बोरनदीवरील बंधाऱ्यांची स्थिती पाहिल्यावर दिसून येते. इतकेच नव्हे, तर नदीवर बंधारे बांधूनही २० वर्षांपासून संबंधितांच्या दुर्लक्षित कारभारामुळे पाणीच अडत नसल्याने बंधाऱ्यांवरील झालेला खर्च व्यर्थ ठरत आहे.घोराड गावानजीक बोर नदीवर शासनाने मोठा निधी खर्च करून दोन कोल्हापुरी बंधाऱ्यांची निर्मिती केली. परंतु, मागील २० वर्षांपासून त्यात पाणीच अडले नसल्याचे शेतकरी सांगतात. विशेष म्हणजे, बंधाऱ्यांपैकी एका बंधाºयाची मागील चार महिन्यांपूर्वी नाममात्र डागडुजी करण्यात आली. तत्कालीन आमदार प्रमोद शेंडे यांनी पुढाकार घेऊन घोराड परिसरात बोरनदीवर हे बंधारे बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. सुरूवातीला या बंधाºयांमध्ये काही वर्ष पाणी अडले. त्यामुळे परिसरातील शेतातील विहिरींच्या पाणीपातळीतदेखील लक्षणीय वाढ झाली होती. सद्यस्थितीत त्याकडे दुर्लक्षच करण्यात धन्यता मानली जात असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. बंधारे सुस्थितीत राहावे याकरिता शेतकºयांची समिती तयार करण्यात आली होती; पण बंधारे बंद करण्यासाठी येणारा महागडा खर्च झेपणारा नसल्याचे वास्तव आहे. असे असले तरी ज्या विभागाकडे देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी आहे, तो विभाग सध्या बघ्याची भूमिकाच घेत असल्याचा आरोप परिसरातील शेतकऱ्यांतून होत आहे. विशेष म्हणजे, २० वर्षांपासून हे बंधारे हिवाळ्याच्या सुरूवातीलाच कोरडे होतात. या बंधाऱ्याच्या पाट्या गायब असून हे बंधारे बंद करण्यासाठी नव्याने साहित्यही संबंधित विभागाकडून आले नाही. लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेले बंधारे शासनातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे निरुपयोगी ठरत असून यात शेतकºयांचे नुकसान होत आहे.डागडुजी नाममात्रकाही महिन्यांपूर्वी स्मशानभूमीजवळ असलेल्या बंधाऱ्याची डागडुजी करण्यात आली. त्यावेळी बंधाºयात अडीच ते तीने फुटांच्या उंचीपर्यंत पाण्याची पातळी राहील, अशी व्यवस्था करण्यात आली; पण करण्यात आलेली डागडुजी किती काळ टिकेल, हे महत्वाचे आहे.उद्देशाला फासले जातेय हरताळशेतकरी सुजलाम्, सुफलाम् व्हावा या हेतूने तत्कालीन आमदार प्रमोद शेंडे यांनी बोरधरण ते सेलूदरम्यान बोरनदीवर अनेक कोल्हापुरी बंधारे बांधले. यापैकी सेलू येथील एक बंधारा वगळता इतर बंधाऱ्यात पाणीच अडत नसल्याने बंधारे बांधण्याच्या उद्देशालाच खो मिळत आहे. याकडे संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे.जे मोठे आणि दुर्लक्षित बंधारे आहेत, त्याच्या दुरूस्तीसंदर्भाने शासनाकडे ११ कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यावर सहानुभूतीपूर्वक विचार होत लवकरच निर्णय होईल.- एच. पी. गहलोत, कार्यकारी अभियंता, लघुसिंचन, वर्धा.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई