शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

बिहाडीत अग्नितांडव, दोन घरे, तीन गोठे खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 11:47 PM

तालुक्यातील बिहाडी येथे शुक्रवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास अग्नितांडव घडला. अचानक लागलेल्या आगीत दोन घरे व तीन गोठे जळून खाक झाले. यात ४० लाखांच्या वर नुकसान झाल्याचे आगग्रस्तांनी सांगितले.

ठळक मुद्देजीवनाश्यक साहित्याचा कोळसा, बैल होरपळला

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : तालुक्यातील बिहाडी येथे शुक्रवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास अग्नितांडव घडला. अचानक लागलेल्या आगीत दोन घरे व तीन गोठे जळून खाक झाले. यात ४० लाखांच्या वर नुकसान झाल्याचे आगग्रस्तांनी सांगितले.बिहाडी गावात शुक्रवारी रात्री अचानक गावठाण शिवारात आग लागली. ही आग पसरत जाऊन संदीप, शरद व सुनील तुकाराम धांदे या भावंडांचे तीन गोठे जळून खाक झाले. यात गुरांचा चारा, शेतीसाहित्य जळाले. गोठ्यांना लागूनच महादेव तुळशीराम रेवतकर व आशा माणिक भोयर यांचे घर असून त्यांच्या घरांनाही आगेने आपल्या कवेत घेतले. आगीत घरातील संपूर्ण साहित्य, अन्नधान्य भस्मसात झाले. माहिती मिळताच ग्रामस्थांनी एकत्र येत आग विझविण्याचा प्रयत्न केला; पण आग आटोक्यात येत नव्हती. आर्वी व पुलगाव येथून बोलविलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझविल्याने पूढील अनर्थ टळला. या दुर्दैवी घटनेमुळे शेतकरी कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळले आहे. जीवनावश्यक तथा शेतीपयोगी साहित्याचा कोळसा झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शनिवारी नायब तहसीलदार बर्वे, तितरे, मंडळ अधिकारी सांभारे, तलाठी गद्रे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यात रेवतकर यांचे ३ लाख ५५ हजार, भोयर यांचे १ लाख ३५ हजार, संदीप धांदे ९७ हजार, शरद धांदे ९० हजार व सुनीलचे ६५ हजारांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल शासनास दिला.बकऱ्या विकून आणलेला गहूदेखील भस्मसातआशा भोयर ही विधवा महिला चार मुलींसोबत संसाराचा गाडा चालविते; पण शुक्रवारची रात्र त्यांना उद्ध्वस्त करून गेली. घरातील संपूर्ण साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. बकऱ्या विकून विकत घेतलेला गहूदेखील आगीत स्वाहा झाला. रेवतकर यांच्या घरातीलही संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. यामुळे दोन्ही कुटुंब उघड्यावर आले असून त्वरित शासकीय मदतीची गरज व्यक्त होत आहे.उदरनिर्वाहासाठी दिले धान्यशनिवारी पं.स. सभापती मंगेश खवशी यांनी बिहाडी गाठत पाहणी केली. यावेळी त्वरित आशा भोयर यांना निराधार योजनेतून आर्थिक मदत सुरू करावी, अशी मागणी तहसीलदारांना केली. खवशी यांनी दोन्ही कुटुंबांना उदरनिर्वाहाकरिता साखर, तांदूळ व अन्य किराणा त्वरित देण्यात आला.दोन जनावरे जखमीअचानक लागलेल्या आगीत गोठ्यात बांधून असलेली दोन जनावरे होरपळली गेली. आग लागल्याचे वेळीच लक्षात आल्याने गोठ्यातील गुरे बाहेर काढण्यात आली. शिवाय भोयर व रेवतकर यांच्या कुटुंबातील सदस्य त्वरित घराबाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

टॅग्स :fireआग