शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

दादासाहेबांच्या आरोग्य शिबिराकडे भाजप नेत्यांचीच पाठ; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 13:38 IST

मतदार संघातील गोतावळाही होतोय कमी

वर्धा : आर्वी विधानसभा क्षेत्रामध्ये गेल्या काही महिन्यांपासून भाजपातच दोन गट पडल्याचे उघडपणे दिसायला लागले आहे. कधीकाळी आमदार दादाराव केचे यांच्या निमंत्रणावरून कार्यक्रमाला उपस्थित राहणारे भाजपचे पदाधिकारी आणि त्यांचा आदेश प्रमाण मानून सावलीसारखे सोबत राहणारे मतदार संघातील कार्यकर्तेही त्यांच्यापासून दूर चालले की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नुकताच आर्वी येथील सहकार मंगल कार्यालयात त्यांनी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराकडे भाजपच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसह मतदार संघातील पदाधिकाऱ्यांनीही पाठ फिरवली. त्यामुळे दादासाहेब एकाकी पडलेय काय? अशी चर्चा मतदार संघात रंगायला लागली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यासन अधिकारी आर्वीपुत्र सुमित वानखेडे यांनी मतदार संघातील भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याकरिता धडपड चालविली. त्यामुळे आपसूकच नागरिक आणि कार्यकर्तेही त्यांच्याशी जुळू लागल्याने मतदार संघात दादासाहेबांपेक्षा त्यांचे वजन वाढायला लागले. बरेच वर्ष रेंगाळत राहिलेली कामे वानखेडे यांनी झटपट मार्गी लावण्याचा सपाटा लावला. परिणामी पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर वर्धा लोकसभाप्रमुखांची जबाबदारी सोपवून त्यांच्या पंखात आणखीच बळ भरले. यामुळे विधानसभेकरिता भाजपानेदादाराव केचे यांना पर्याय शोधल्याची चर्चा जोर धरू लागली. त्यामुळेच दादासाहेबांच्या सोबत राहणारे पदाधिकारी व कार्यकर्तेही सुमित वानखेडे यांच्या पाठीशी असल्याचे विविध कार्यक्रमातून दिसायला लागले.

दादासाहेबांनी ज्यांना पंचायत समिती, जिल्हा परिषद यासह नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये नेतृत्व करण्याची संधी दिली होती. त्यांनीही आता साथ सोडल्याचे दिसायला लागले. एरवी आर्वीतील आमदारांचा कार्यक्रम म्हटला की, जिल्ह्यातील भाजपचे नेते, पदाधिकारी व मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा गोतावळा उपस्थित राहायचा. मात्र, महाआरोग्य शिबिराला भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षाशिवाय कोणताही जिल्ह्यातील पक्षाचा नेता किंवा पदाधिकारी दिसला नसल्याने याबाबत ‘पक्षादेश’ तर झाला नसावा ना? अशीही चर्चा आता रंगायला लागली असून यावरून आगामी निवडणुकीकरिता आमदार दादाराव केचे यांची वाटचाल खडतर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अजूनही आर्वीतील दहीहंडीचीच चर्चा

आमदार दादाराव केचे यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आर्वीत गोकुळाष्टमीला दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची भाजपच्या स्थानिक पदाधिकारी व लोकसभाप्रमुखांना कल्पना व निमंत्रण दिले नव्हते. त्यामुळे अनेकांमध्ये नाराजीचा सूर होता.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाDadarao Kecheदादाराव केचेwardha-acवर्धा