शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भाजपच्या ओबीसी यात्रेचा पारडीतून जागर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 10:40 IST

अठरापगड जातींसह उपजातींना न्याय देणार : चंद्रशेखर बावनकुळे

हिंगणघाट (वर्धा) : भाजपची ओबीसी जागर यात्रा विदर्भातील ९ लोकसभा क्षेत्रातून जात ओबीसींसाठीच्या केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा जागर करणार आहे. सोमवारी महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी विदर्भातील वर्धा जिल्ह्यातून या यात्रेचा शुभारंभ झाला. पारडी (नगाजी) येथून निघालेली यात्रा हिंगणघाटात पोहोचली. यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे, खासदार संगमलाल गुप्ता, आमदार समीर कुणावार, माजी आमदार आशिष देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांचे क्रेनद्वारे तीस फूट लांबीचा हार अर्पण करून स्वागत करण्यात आले.

शेतकऱ्यांचे हित साधले जावे, युवकांना रोजगार मिळावा, महिलांचे कल्याण व्हावे आणि ओबीसीमध्ये सहभागी असणाऱ्या १८ पगड जाती, १२ बलुतेदार व ३५० हून अधिक उपजातींना न्याय मिळवून देण्याचे काम जागर यात्रा करेल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला. बिहारप्रमाणेच महाराष्ट्रातही ओबीसी समाजाचा डेटा तयार करण्याची मागणी राज्य शासनाकडे करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी आमदार बावनकुळे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, सुवर्ण व्यावसायिक सुभाष निनावे यांनी कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश घेतला.

निखाडे भवनात आयोजित कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, खासदार रामदास तडस, विदर्भ संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, आमदार डॉ. रामदास आंबटकर, जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे, डॉ. उषाकिरण थुटे, शहराध्यक्ष भूषण पिसे, अनिता माळवे, अर्चना वानखेडे उपस्थित होते. सूत्रसंचालन किशोर दिघे यांनी केले. आभार सुनील गफाट यांनी मानले.

सोयाबीन उत्पादकांना मदतीची मागणी

आमदार समीर कुणावार यांनी सोयाबीन उत्पादकांची व्यथा मांडून पिवळ्या रोगामुळे ८० टक्के उत्पादन शेतकऱ्यांच्या हातून गेलेले आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. त्यांना तातडीने मदत देण्याची गरज असून, शासनाने सोयाबीन उत्पादकांना पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून लवकरात लवकर मदत द्यावी, अशी मागणी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे