शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा फॉर्म्युला १००-८०-८०...; दोन दिवसांत तोडगा काढून जागावाटप जाहीर करणार, 'या' एका गोष्टीवर एकमत नाही!
2
राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर पेच; तिकिटासाठी कोणता झेंडा हाती? आधी करतायत चाचपणी 
3
आजचे राशीभविष्य: ५ राशींना धनलाभ, प्रमोशन, पगारवाढ योग; चैतन्य, उत्साहाचा दिवस
4
भाजपचे १०५ उमेदवार ठरले; काही विद्यमान आमदारांना मिळणार डच्चू!
5
कलम ३७० रद्दचा निर्णय कायम ठेवणारे न्या. संजीव खन्ना होणार सरन्यायाधीश; ५१वे सरन्यायाधीश म्हणून ६ महिने राहणार पदाव
6
मुलासमोर लैंगिक संबंध, नग्न होणे लैंगिक छळच; पोक्सो कायद्यानुसार गुन्हा - केरळ हायकोर्ट
7
रेल्वे प्रवासाचे आरक्षण आता १२० नव्हे, ६० दिवस आधी करा 
8
कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो तोंडघशी; ठोस पुरावे नव्हते
9
न्या. संजीव खन्ना नवे सरन्यायाधीश! सरन्यायाधीश चंद्रचूड यांची शिफारस, ११ रोजी शपशविधी
10
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
11
IAS अधिकारी रानू साहू यांना अटक, 540 कोटींचा DMF घोटाळा काय?
12
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?
13
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
14
Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास; दक्षिण आफ्रिकेनं दिमाखात गाठली फायनल
15
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
16
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
17
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
18
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
19
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
20
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान

संतप्त विद्यार्थ्यांनी अडविली अवेळी धावणारी बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 2:25 AM

ग्रामीण भागातील बसेसचे वेळापत्रक विद्यार्थ्यांच्या शाळा, महाविद्यालयाच्या वेळा लक्षात घेऊन तयार केले जाते;

अंदोरी येथील प्रकार : निवेदने देऊनही कार्यवाही शून्यलोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : ग्रामीण भागातील बसेसचे वेळापत्रक विद्यार्थ्यांच्या शाळा, महाविद्यालयाच्या वेळा लक्षात घेऊन तयार केले जाते; पण अंदोरी येथील विद्यार्थ्यांना सोईस्कर बसेस नसल्याने शैक्षणिक नुकसान सोसावे लागत आहे. याबाबत अनेकदा निवेदने देण्यात आली; पण अद्याप कार्यवाही करण्यात आली नाही. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी गुरूवारी सकाळी अंदोरी येथे बस अडवून धरली. किमान या आंदोलनानंतर तरी बसची वेळ बदलली जाईल, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.तालुक्यातील अनेक विद्यार्थी देवळी, पुलगाव तथा वर्धा या शहरांमध्ये शिक्षणासाठी जातात; पण त्यांना शाळा, महाविद्यालयात वेळेवर पोहोचण्यासाठी बसफेरी उपलब्ध नाही. परिणामी, दररोज विद्यार्थी विलंबाने शाळा, महाविद्यालयात पोहोचतात. यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत ११ जुलै रोजी निवेदन देण्यात आले होते. पुलगाव पोलीस स्टेशन तथा खा. रामदास तडस यांच्यामार्फतही परिवहन महामंडळाला निवेदन देण्यात आले; पण बसफेरीचा वेळ बदलण्यात आला नाही. कार्यवाही होत नसल्याने विद्यार्थ्यांनी पुलगाव बसस्थानक प्रमुखांनादेखील निवेदन सादर केले होते; पण अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला होता. गुरुवारी संतप्त विद्यार्थ्यांनी एकत्र येत आंदोलन केले. अंदोरी येथे बस अडवून धरण्यात आली. या आंदोलनातून विद्यार्थ्यांनी बसफेरीचा वेळ बदलण्यात यावा, ही मागणी लावून धरली. पुलगाव आगाराने अंदोरी येथे येणाऱ्या बसफेरीची वेळ न बदलल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संतप्त विद्यार्थ्यांकडून देण्यात आला. अंदोरी तथा लगतच्या गावांतील विद्यार्थ्यांनी आंदोलनात सहभाग घेत राज्य परिवहन महामंडळाचा निषेध नोंदविला.