शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

तीन महिन्यांकरिता चालक परवाना होणार रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:04 AM

वाहन चालविताना मोबाईलवर बोलल्याने अनेक अपघात झाले. उत्तर प्रदेश येथे याच प्रकारातून नुकताच १४ विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला आहे. वर्धेत असा प्रकार घडू नये याकरिता उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने वेळीच सतर्कता मोहीम राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देकायद्यात तरतूद : वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे पडणार महाग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाहन चालविताना मोबाईलवर बोलल्याने अनेक अपघात झाले. उत्तर प्रदेश येथे याच प्रकारातून नुकताच १४ विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला आहे. वर्धेत असा प्रकार घडू नये याकरिता उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने वेळीच सतर्कता मोहीम राबविण्यात येत आहे. शिवाय वाहन चालविताना मोबाईल वापरल्यास त्या चालकाचा मोटर वाहन कायद्याच्या कलम १२९ (ए) अन्वये तीन महिन्याकरिता वाहन परवाना रद्द करण्याचे प्रावधान आहे. जिल्ह्यात या प्रावधानाचा वापर वाढण्याची शक्यता आहे.विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविण्याकरिता सर्वत्र स्कूल बसचा वापर होतो. यात जिल्ह्यात छोट्या खासगी स्कूल बसचा भरणा वाढला आहे. या स्कूल बसमधून आपल्या पाल्यांना पालक शाळेत पाठवित असल्याचे दिसून आले आहे. यात परवाना नसतानाही बरेच आॅटो स्कूल आॅटो म्हणून धावत आहेत. वर्धेत या आॅटो आणि स्कूलबसमध्ये परवानगीपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे वहन होत असल्याचे समोर आले आहे. शिवाय वाहतूक कायदा आणि स्कूल बसच्या नियमानुसार सुविधा आहे अथवा नाही याची चौकशी होणे अपेक्षित आहे. या कारणामुळे स्कूल बसचा परवाना रद्द करण्याची गरज आहे.वर्धेत बऱ्याच स्कूलबसचे चालक वाहन चालविताना मोबाईल वापरत असल्याचे दिसून आले आहे. या संदर्भात उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व वाहतूक पोलिसांनी संयुक्त रित्या कार्यवाही करून अशा चालकांवर कारवाई करीत मोहीम आखण्याची पालकांची अपेक्षा आहे. सध्या जिल्ह्यात रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या पंधरवड्यात स्कूल बस चालकांना या संदर्भात सूचना देण्याकरिता एखादे शिबिर आयोजित करून त्यांना समज देण्याची मागणी होत आहे. लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाहन चालविताना मोबाईलवर बोलल्याने अनेक अपघात झाले. उत्तर प्रदेश येथे याच प्रकारातून नुकताच १४ विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला आहे. वर्धेत असा प्रकार घडू नये याकरिता उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने वेळीच सतर्कता मोहीम राबविण्यात येत आहे. शिवाय वाहन चालविताना मोबाईल वापरल्यास त्या चालकाचा मोटर वाहन कायद्याच्या कलम १२९ (ए) अन्वये तीन महिन्याकरिता वाहन परवाना रद्द करण्याचे प्रावधान आहे. जिल्ह्यात या प्रावधानाचा वापर वाढण्याची शक्यता आहे.विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविण्याकरिता सर्वत्र स्कूल बसचा वापर होतो. यात जिल्ह्यात छोट्या खासगी स्कूल बसचा भरणा वाढला आहे. या स्कूल बसमधून आपल्या पाल्यांना पालक शाळेत पाठवित असल्याचे दिसून आले आहे. यात परवाना नसतानाही बरेच आॅटो स्कूल आॅटो म्हणून धावत आहेत. वर्धेत या आॅटो आणि स्कूलबसमध्ये परवानगीपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे वहन होत असल्याचे समोर आले आहे. शिवाय वाहतूक कायदा आणि स्कूल बसच्या नियमानुसार सुविधा आहे अथवा नाही याची चौकशी होणे अपेक्षित आहे. या कारणामुळे स्कूल बसचा परवाना रद्द करण्याची गरज आहे.वर्धेत बºयाच स्कूलबसचे चालक वाहन चालविताना मोबाईल वापरत असल्याचे दिसून आले आहे. या संदर्भात उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाºयांनी व वाहतूक पोलिसांनी संयुक्त रित्या कार्यवाही करून अशा चालकांवर कारवाई करीत मोहीम आखण्याची पालकांची अपेक्षा आहे. सध्या जिल्ह्यात रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या पंधरवड्यात स्कूल बस चालकांना या संदर्भात सूचना देण्याकरिता एखादे शिबिर आयोजित करून त्यांना समज देण्याची मागणी होत आहे.जिल्ह्यात ४६९ स्कूल बस धावतात रस्त्यावरवर्धा जिल्ह्यात आजच्या घडीला एकूण ४६९ स्कूल बस रस्त्याने धावत आहेत. त्यांची नोंदणी उप प्रादेशिक परिवहन विभागात आहेत. स्कूल बस म्हणून आवश्यक असलेल्या सुविधा या वाहनांत असल्याचे चालकांकडून सांगण्यात आले आहे. वास्तविकतेत स्कूल बसचा परवाना घेताना या सुविधा असतात व नंतर त्या वाहनातून बेपत्ता होत असल्याचे दिसून आले आहे. याची चौकशी संबंधीत विभागाने करण्याची गरज आहे.जिल्ह्यात कुठल्याही आॅटोला शाळेत विद्यार्थ्यांना पोहोचविण्याची परवानगी नाही. असे असताना मोठ्या प्रमाणात आॅटोतून विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे. अशा आॅटोंवर वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाºयांनी कार्यवाही करण्याची गरज आहे. अन्यथा यातून एखादी मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.वयानुसार ठरते विद्यार्थी संख्यास्कूल बसमध्ये विद्यार्थी बसविताना त्यात वयानुसार संख्या कमी जास्त करण्यात आली आहे. खासगीत धावणाऱ्या स्कूल बस या सहा सिटर आहेत. त्यामुळे या वाहनात १२ वर्षाखालील नऊ मुले आणि यापेक्षा अधिक वयाचे विद्यार्थी असतील तर त्यांची संख्या सहा असावी असा नियम आहे. येथे मात्र या दुप्पट विद्यार्थी बसविल्या जात असल्याचे दिसून आले आहे.पालकांनीही सतर्कता बाळगण्याची गरजजिल्ह्यात असलेल्या बऱ्याच शाळांना उन्हाळी सुट्या लागल्या आहेत. यामुळे बऱ्यापैकी स्कूल बस बंद आहेत. पण लवकरच शाळा सुरू होणार आहेत. या काळात खासगी स्कूल बस चालकाकडून नियमानुसार सर्व सुविधा पुरविण्यात येत आहे अथवा नाही, याची तपासणी करण्याची गरज आहे. आपला मुलगा जातो त्या बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी तर नाही ना, याची तपासणी पालकांनी करणे अपेक्षित आहे.