शहरं
Join us  
Trending Stories
1
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
2
"निवडणूक एका टप्प्यात, आता ते सुद्धा एकाच टप्प्यात...", जयंत पाटलांचा महायुतीला टोला
3
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
5
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया
6
"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?
7
या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आलिया भट, खुद्द स्वतःच 'जिगरा' स्टारने केला खुलासा
8
Kamran Ghulam चा शतकी नजराणा! पदार्पणात असा पराक्रम करणारा पाकचा दुसरा वयोवृद्ध बॅटर
9
'इन्फ्लुएन्सर्स' हा नवा आजार आला आहे...अभिनेत्री सीमा पाहवा भडकल्या; ही कोणाची चूक?
10
टाटा समूहाची मोठी घोषणा, पुढील पाच वर्षात 5 लाख तरुणांना नोकऱ्या देणार
11
रिस्क नकोच! आपल्या स्टार गोलंदाजाबद्दल Rohit Sharma अगदी स्पष्टच बोलला!
12
यूपी, बंगालसह १५ राज्यांतील विधानसभेच्या ४८ जागांसाठी रंगणार पोटनिवडणूक, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला  
13
महाराष्ट्राबरोबरच झारखंडमध्येही वाजलं निवडणुकीचं बिगुल, दोन टप्प्यांत होणार मतदान 
14
Rohit Sharma Records, IND vs NZ 1st Test: रोहित शर्माचे फक्त ५ षटकार अन् बनणार भारताचा 'सिक्सर किंग'; या दिग्गजाचा विक्रम धोक्यात
15
Nanded Lok Sabha Bypoll 2024 Date: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा; निकाल कधी?     
16
आचारसंहिता म्हणजे काय? नियम आणि कधीपासून लागू होते? जाणून घ्या सविस्तर...
17
निवडणूक घोषित होताच अजित पवारांना धक्का; माजी आमदारानं साथ सोडली, महायुतीला फटका
18
100 KM वेगाने धावणाऱ्या ट्रेनच्या आपत्कालीन खिडकीतून चिमुकली बाहेर उडून पडली; पुढे...
19
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून खास रणनीती, या नेत्यांकडे सोपवली विभागनिहाय जबाबदारी 
20
“विधानसभेलाही मराठवाड्यात मनोज जरांगेंचा इफेक्ट दिसेल, मविआ उमेदवार जिंकतील”: बजरंग सोनावणे

पंतप्रधान आवासकरिता पालिकेत नागरिकांची झुंबड

By admin | Published: June 30, 2016 2:11 AM

शहरातील गरजवंतांना घर देण्याकरिता शासनाच्यावतीने प्रधापमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे.

पालिकेतून सात हजार अर्जांची विक्री वर्धा : शहरातील गरजवंतांना घर देण्याकरिता शासनाच्यावतीने प्रधापमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता पालिकेत नागरिकांची चांगलीच झुंबड उडत आहे. या योजनेचे बुधवारपर्यंत एकूण सात हजार अर्जांची विक्री झाल्याचे सांगण्यात आले आहे. यातील दोन हजार ५०० नागरिकांनी आवश्यक कागदपत्रासह पालिकेत अर्ज सादर केले आहेत. ही योजना राबविण्याकरिता पालिकेच्यावतीने योजनेची मुदत वाढवून दिली आहे. पूर्वी ३० जून असलेली मुदत आता १५ जुलै करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ शहरातील सर्वच गरजवंताना मिळावा याकरिता पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आल्याचे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले आहे. कागदपत्रांची अट शिथिलवर्धा : आवास योजनेचा लाभ घेताना आवश्यक कागदपत्र गोळा करण्याकरिता नागरिकांना अनेक अडचणी होत होत्या. त्या कमी करण्याकरिता काही आवश्यक कागदपत्रांची पर्यायी व्यवस्था म्हणून इतर कागदपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. यात घरमालकाकडून भाड्याने राहत असल्याचे लिहून आणण्याची अट रद्द करण्यात आली. यामुळे अनेकांना घर मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. मिळकत प्रमाणपत्राच्या जागी बँकेचे पासबूक व शिधापत्रिकेच्या जागी मतदार ओळख पत्र देण्याची सुविधा वर्धा पालिकेच्यावतीने करण्यात आल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. यामळे वर्धेतील गरजवंतांना या योजनेचा लाभ घेणे कठीण होत नसल्याचे दिसून आले आहे.(प्रतिनिधी)