शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजप विरोधी होणे गुन्हा आहे का? आम्ही त्यालाच मतदान करणार जो..."; अविमुक्तेश्वरानंद महाराष्ट्रात कुणासोबत?
2
जरांगे फॅक्टरला उत्तर, भाजपचा प्लान ठरला; मराठवाड्यातील १६ पैकी किती ठिकाणी मराठा उमेदवार दिले?
3
मोठी बातमी: भाजपच्या दोन बड्या नेत्यांची मुले शिवसेनेच्या तिकिटावर लढणार?; शिंदेभेटीमुळे भुवया उंचावल्या
4
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महायुती विरुद्ध मविआ; मराठवाडा सत्तेची समीकरणं बदलणार?
5
प्रेरणादायी! ४ वेळा नापास, परीक्षेच्या आदल्या रात्री पॅनिक अटॅक; UPSC क्रॅक करून केली कमाल
6
महाराष्ट्र निवडणुकीत संघानं बनवली रणनीती; कोणकोणत्या मुद्द्यांवर करणार प्रचार?
7
राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार येणार, कारण...; मध्य प्रदेशचं उदाहरण देत पडळकरांनी सांगितलं गणित
8
कुठे हसू तर कुठे अश्रू! न्यूझीलंडच्या महिला जगज्जेत्या; आफ्रिकेच्या पोरींच्याही पदरी निराशा Photos
9
"हा माझा चॉईस नव्हता, पण..."; लोकप्रिय अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री?, आता केला मोठा खुलासा
10
उद्धव ठाकरे-भाजपा पुन्हा एकत्र येणार?; संजय राऊतांनी एका वाक्यातच पाणउतारा केला
11
PAK vs AUS : पाकिस्तानला सुखद धक्का! भारताविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या स्टार खेळाडूची माघार
12
स्वतःसाठी पक्ष बदलता, मराठा आरक्षणासाठी काय केलं? शिंदे गटाच्या आमदाराला वृद्धाचा सवाल
13
नवऱ्यामुळे मुलीला HIV, Ex बॉयफ्रेंडने शेवटपर्यंत केली सेवा; काँग्रेस आमदारालाही आले गहिवरून
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:तिसऱ्या आघाडीची पहिली यादी झाली जाहीर; बच्चू कडूंसह या नेत्यांना उतरवले मैदानात
15
दुबईमध्ये अनेक पादचाऱ्यांवर करण्यात आली दंडात्मक कारवाई, समोर आलं असं कारण?
16
30-40 जागांचा वाद! शरद पवार, उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन मार्ग काढू; नाना पटोलेंची स्पष्टोक्ती
17
विधानसभा नाही, लोकसभेवेळच्या एकमेकांवरील परोपकारावरून ठाकरे-काँग्रेसचे जागावाटप अडले? नेमके काय घडले...  
18
भारत-चीनमधील सीमावाद संपणार! दोन्ही देशांमध्ये LAC वर गस्तीबाबत झाला महत्त्वाचा करार
19
Archery world Cup Final : वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताच्या दीपिकाचा पदकावर निशाणा; रौप्य पदकाची कमाई
20
कल्याण पूर्वेत महायुतीचा वाद विकोपाला; महेश गायकवाड निवडणूक लढण्याच्या तयारीत

सात दशकांपासून शहर विकासापासून वंचितच

By admin | Published: May 04, 2017 12:51 AM

कामगारांचे शहर अशी ओळख असलेल्या पुलगाव शहरात सर्व भौगोलिक सुविधा असताना विकासाच्या दृष्टीने ठोस पावले

एकही नवीन उद्योग नाही : जुन्या उद्योगांनाही घरघर, रोजगार संधीची प्रतीक्षा कायमच पुलगाव : कामगारांचे शहर अशी ओळख असलेल्या पुलगाव शहरात सर्व भौगोलिक सुविधा असताना विकासाच्या दृष्टीने ठोस पावले उचचल्या गेली नाही. त्यामुळे मागील सात दशकात हा परिसर विकासाच्या दृष्टीने उपेक्षितच राहिला आहे. काँग्रेसने विकास होऊ दिला नाही, असे म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून शहराच्या विकासाकरिता कोणत्या उपाययोजना केल्या जातात याकडे शहर वासीयांचे लक्ष लागले आहे. राज्यातील नव्हे तर देशाच्या राजकारणात महत्वाचे स्थान मिळविणारे सक्षम नेतृत्व या क्षेत्राने दिले आहे. परंतु शहराच्या विकासाकडे मात्र सर्वच लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीशांच्या राजवटीत १८८९ साली पुलगाव कॉटन मील व १९४२ साली स्थापन झालेला केंद्रीय दारूगोळा भांडार सोडले तर या भागात सात दशकात कुठलाही दुसरा मोठा उद्योग उभा राहिलेला नाह. मुंबई-हावडा या रेल्वे मार्गावर असणारे कवठा हे गाव इंग्रज राजवटीत जिल्ह्याचे मुख्यालय होते. गावालगतच बारामाही वाहणारी वर्धा नदी आहे. परिसरातील भौगोलिक परिस्थिती पाहून इंग्रज शासनाने १९६५ साली या नदीवर रेल्वे पुलाची निर्मिती करीत या गावाला ‘ब्रीजटाऊन’ पुलगाव हे नाव दिले. पुढे भौगोलिक परिस्थिती व दळणवळणाची व्यवस्था पाहून १८८९ साली नागपूरच्या बुटी परिवाराने येथे कापड गिरणी सुरू करून विकासाची मुहूर्तमेढ रोवली. पुढे हा उद्योग भरभराटीस येवून ३ हजार ५०० कामगारांचा मोठा वस्त्रोद्योग झाला. या शहराचे महत्व व उपलब्ध असलेली भौगोलिक परिस्थिती इंग्रजाचा कळली. म्हणूनच त्यांनी १९४२ साली शहरात देशातील सरंक्षण विभागाचा सर्वात मोठे केंद्रीय दारूगोळा भांडाराची स्थापना करून शहराच्या विकासाला काही प्रमाणात दिशा दिली. मात्र गत काही दशकात शहाराच्या विकासाची गती मंदावल्याचे दिसते. पुलगाव येथून नागपूर-मुंबई द्रुतगती मार्ग, हैदराबाद-भोपाळ महामार्ग जातो. मात्र येथे एकही मोठा उद्योग उभारलेला नाही. विकासाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या या शहराचा विकास करणे तर सोडाच मात्र पुलगाव कॉटन मील व नॅरोगेज रेल्वेमार्ग बंद करून शासनाने शहराच्या विकासाला पाने पुसली आहे. या शहरालगत असलेल्या शासकीय पडीत जागेवर औद्योगिक वसाहत स्थापन व्हावी म्हणून तीन दशकापासून शहरावासीयांनी साकडे घातले आहे. परंतु येथील औद्योगिक वसाहतीचे घोडे पेंड खावून पडले ते तीन दशकापाूसन उठलेच नाही. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी अल्प आहे. याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. येथील भौगोलीक सुविधांची उपलब्धता पाहता विकासाची प्रतीक्षा शहरवासीयांना आहे. (तालुका प्रतिनिधी)