शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
2
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
3
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
4
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
5
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
6
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
7
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
8
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
9
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
10
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
11
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खंत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
13
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
14
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
15
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
16
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
17
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
18
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
19
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
20
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप

बसस्थानकात अस्वच्छतेचा कळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 10:42 PM

जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा बसस्थानकात अस्वच्छतेने कळस गाठला आहे. बसस्थानक परिसर नेहमीच स्वच्छ रहावा यासाठी रापमने खासगी कंपनी नियुक्त केली असली तरी वर्धा बस स्थानकात घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे.

ठळक मुद्देप्रवाशांना दुर्गंधीचा त्रास : व्यवस्थापकांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा बसस्थानकात अस्वच्छतेने कळस गाठला आहे. बसस्थानक परिसर नेहमीच स्वच्छ रहावा यासाठी रापमने खासगी कंपनी नियुक्त केली असली तरी वर्धा बस स्थानकात घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. यामुळे सदर खासगी कंपनीच्या कार्यप्रणालीवर नागरिकांसह प्रवाशांकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याकडे रापमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत सदर खासगी कंपनीला योग्य सुचना देण्याची गरज आहे.जिल्ह्याचे स्थळ असल्याने वर्धा शहरात दररोज विविध कामानिमित्त अनेक शासकीय कार्यालयात ग्रामीण भागातील नागरिक येतात. मात्र, ज्या ठिकाणी वर्धा शहरात येताच ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रथम पाऊल पडते तोच वर्धा बस स्थानकाचा परिसराची दैना पाहून नागरिकांकडून सध्या आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वर्धा बस स्थानक परिसरात ठिकठिकाणी कचºयाचे ढिगारे कायम असल्याचे दिसून येते. शिवाय पावसामुळे ओला झालेला कचरा गत काही दिवसांपासून त्याच परिसरात कुजत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.ज्या खासगी कंपनीला वर्धा बस स्थानक नेहमीच स्वच्छ रहावे यासाठीचा कंत्राट दिला आहे, त्याच कंपनीचे सुमारे पाच कर्मचारी तेथे दररोज कार्यरत केले जातात; पण तेही आपल्या मनमर्जीनेच काम करीत असल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य राहत असल्याचे परिसरातील व्यावसायिक सांगतात. प्रवाशांचे सुदृढ आरोग्य हा हेतू केंद्रस्थानी ठेवून बसस्थानक व्यवस्थापक व रापमच्या वरिष्ठ अधिकाºयांनी योग्य पाऊल उचलण्याची मागणी आहे.वर्धा बसस्थानक नेहमीच स्वच्छ व सुंदर रहावे यासाठी एका खासगी कंपनीला जिल्ह्यातील सर्वच बसस्थानक स्वच्छ ठेवण्याचा कंत्राट देण्यात आला आहे. वेतन न मिळाल्याने सदर कंपनीच्या कर्मचाºयांनी गत काही दिवस त्यांचे काम केले नाही. त्यामुळे कदाचित परिसरात घाणीचे साम्राज्य असेल. वेळीच बसस्थानक स्वच्छ करण्याच्या सुचना देण्यात येईल.- चेतन हासबनीस, विभाग नियंत्रक, रा.प.म. वर्धा.