शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

नुकसानभरपाई द्या, कृषी पंपाची वीज तोडणी थांबवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 05:00 IST

जिल्ह्यात सन २०२० च्या खरीप हंगामात आणि याही वर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे सोयाबीनला मोठ्या प्रमाणात फटका बसला. अशातच गुलाबी बोंड अळी आणि बोंडसडीमुळे कपाशीचे पीकही हातचे गेले. बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशी उपटून रब्बीची तयारी चालविली. यादरम्यान अवकाळी पावसाने दणका दिल्याने नुकसानीत आणखी भर पडली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सन-२०२० मध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे झाले असून, अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. अशा स्थितीत महावितरणकडून शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची विद्युत जोडणी कापली जात आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय असून, तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करावी आणि विद्युत जोडणी तोडण्याचे काम थांबवावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.जिल्ह्यात सन २०२० च्या खरीप हंगामात आणि याही वर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे सोयाबीनला मोठ्या प्रमाणात फटका बसला. अशातच गुलाबी बोंड अळी आणि बोंडसडीमुळे कपाशीचे पीकही हातचे गेले. बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशी उपटून रब्बीची तयारी चालविली. यादरम्यान अवकाळी पावसाने दणका दिल्याने नुकसानीत आणखी भर पडली. या सर्व नुकसानीचे प्रशासनाकडून पंचनामे करून जिल्ह्यातील आठही तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाकडे १७८ कोटींची मागणी करण्यात आली. पण, अद्यापही रक्कम प्राप्त न झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.एकीकडे शासनाकडे असलेला शेतकऱ्यांच्या हक्काचा मदत निधी दिला जात नाही तर दुसरीकडे पैश्याअभावी विद्युत देयक थकल्याने महावितरणकडून कृषी पंपाची जोडणी कापण्याचा सपाटा लावला आहे. परिणामी आता रब्बी हंगामातीलही पीक  धोक्यात आले आहे. या अन्याविरुध्द आवाज उठविण्याकरिता भाजपाचे हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केले आहे. शासनाने या मागणीची तातडीने दखल घ्यावी याकरिता खासदार रामदास तडस, जि. प. अध्यक्ष सरिता गाखरे, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार दादाराव केचे, जि. प. च्या सभापती मृणाल माटे यांनी जिल्हाधिकारी  देशभ्रतार यांची भेट घेऊन निवेदन दिले. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीRamdas Tadasरामदास तडस