शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

काँग्रेस देशात टुकडे टुकडे गँग अन् अर्बन नक्षलवाद चालवत आहे; वर्धा येथे PM मोदींचा घणाघात

By रवींद्र चांदेकर | Updated: September 20, 2024 22:51 IST

ही महात्मा गांधी यांची काँग्रेस असूच शकत नाही, असेही मोदी म्हणाले.

वर्धा: विरोधकांची भाषा, बोली, परदेशात देशविरोधी वक्तव्य, देश तोडण्याची भाषा, संस्कृती आणि आस्थांचा अपमान करणे, ही विरोधकांची प्रवृत्ती आहे. काँग्रेस देशात टुकडे टुकडे गँग आणि अर्बन नक्षलवाद फोफावू इच्छिते, असा घणाघात पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केला.

वर्धा येथील स्वावलंबी मैदानात शुक्रवारी पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळा पार पडला. आपल्या ३१ मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्यातून त्यांनी देश एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्ली काँग्रेसचे तुष्टीकरणाचे भूत जागे झाले असून, कर्नाटकात त्यांनी चक्क गणपती बाप्पालाच पिंजऱ्यात कैद केल्याचे ते म्हणाले.

"ही महात्मा गांधी यांची काँग्रेस असूच शकत नाही. काँग्रेसचे नेते परदेशात जाऊन देशविरोधी अजेंडा चालवितात. मात्र, आम्हाला परंपरा, संस्कृती, सन्मान, विकासासोबत एकत्र व्हायचे आहे. महात्मा गांधी यांनी ग्रामीण विकासासाठी कुटीर उद्योगाचा मंत्र दिला. मात्र, देशावर ७० वर्षे राज्य करणाऱ्या काँग्रेसने महात्मा गांधी यांच्या विचारांना तिलांजली दिली. परिणामी ग्रामीण उद्योग उद्ध्वस्त झाले. मात्र, एनडीए सरकाने पीएम कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून पारंपारिक लघुउद्योग आणि ग्रामीण कारागिरांना सन्मान देण्याचे काम केले आहे. आता एकत्रितपणे देशाचा गौरव वाढवू या", असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मंचावर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री जितनराम मांझी, जयंत चौधरी, उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री उदय सामंत, ना. चंद्रकांत पाटील, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, आ. दादाराव केचे, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, माजी खासदार रामदास तडस आदींची उपस्थिती होती.

१४ लाख कारागिरांना योजनेचा लाभ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीएम विश्वकर्मा योजनेचा राज्यातील १४ लाख ७२ हजार कारागिरांना लाभ मिळाल्याचे यावेळी सांगितले. ‘लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो’, अशी त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यांनी राज्यातील सहा कोटी महिला आत्मनिर्भर झाल्याचे सांगितले. वन नेशन, वन इलेक्शन निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. कुणी कितीही प्रयत्न केला तरी देशातील आरक्षण संपवू शकत नसल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :prime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी