शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

तज्ज्ञांचा अंदाज चुकल्याने कापूस उत्पादकांना फटका; अजूनही पाढरं सोनं शेतकऱ्यांच्या घरातच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 10:54 IST

भाववाढीची प्रतीक्षा कायम

फनिंद्र रघाटाटे

रोहणा (वर्धा) : यावर्षी देशात ३६० लाख गाठी बांधता येईल इतके कापसाचे उत्पादन होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला होता. अतिवृष्टी व महापुरामुळे जमीन खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर हा अंदाज ३४० लाख गाठीपर्यंत आला. उत्पादनामध्ये घट झाल्याने बाजारपेठेत आवक मंदावल्याने बाजारभाव कायम राहण्याऐवजी तो गडगडला. अद्यापही कापसाचे भाव कमी असून, उत्पादक भाववाढीच्या प्रतीक्षेत आहेत.

त्यामुळे अद्यापही बहुतांश शेतकऱ्यांच्या घरात कापूस साठवून आहे. फेब्रुवारी महिन्यापर्यंत बाजारात १४५ लाख गाठी बांधता येईल एवढा कापूस बाजारात आला होता. आता भाव वाढेल की नाही, याची काहीही शाश्वती नसल्याने आर्थिक अडचणीमुळे मार्च महिन्यात शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात कापूस विकला. परिणामी मार्च महिन्यामध्ये १०० लाख गाठी बांधता येईल, एवढा कापूस बाजारात आला. यावरून आतापर्यंत २४५ लाख गाठींचा कापूस बाजारात आल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांकडे अद्यापही २० टक्के कापूस शिल्लक आहे. व्यापारी किंवा तज्ज्ञ काहीही अंदाज बांधत असले तरी ५० लाख गाठींचा कापूस शेतकऱ्यांच्या घरातच आहे. आता शेतकऱ्यांची साठवणूक क्षमता संपली असून तो कापूस बाजारात आला तर शेवटपर्यंत ३०० लाख गाठींचाच कापूस उत्पादित होईल. यापेक्षा जास्त कापूस बाजारपेठेत येऊच शकणार नाही. यावरून व्यापारी धार्जिण्या तज्ज्ञांनी सुरुवातीला व आतापर्यंत व्यक्त केलेला अंदाज खोटा आणि फसवा ठरल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्याचे मत व्यक्त होत आहे.

भाव वाढणार, पण कापूस व्यापाऱ्यांकडे गेल्यानंतरच!

भाववाढीच्या प्रतीक्षेत आतापर्यंत ८० टक्केच कापूस बाजारात आला असून, अद्यापही २० टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात आहे. या शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात कापूस विकावा लागला. बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतरही भाववाढ मिळाली नसल्याने येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांकडील शिल्लक असलेला कापूस बाजारात येईल. त्यानंतर तो व्यापाऱ्यांकडे गेल्यावर भाववाढीला सुरुवात होऊन याचा फायदा केवळ व्यापाऱ्यांनाच होणार आहे, असे कृषी अभ्यासकांकडून सांगितले जात आहे.

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूसwardha-acवर्धा