शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शिक्षकांच्या दबावतंत्राचा ‘दीपाली’ ठरली बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 00:27 IST

नजीकच्या पिपरी (मेघे) येथील अग्रगामी हायस्कूलमध्ये नववीचे शिक्षण घेणाऱ्या दीपाली रवींद्र जानवे (१४) हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी रात्री घडली. दीपाली हिच्यावर तिच्या शाळेतील शिक्षकांनी अभ्यासाबाबत अतिशय जास्त मानसिक दडपण आणले होते.

ठळक मुद्देमृताच्या आईचा आरोप : अग्रगामी हायस्कूलमधील प्रकार, योग्य कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नजीकच्या पिपरी (मेघे) येथील अग्रगामी हायस्कूलमध्ये नववीचे शिक्षण घेणाऱ्या दीपाली रवींद्र जानवे (१४) हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी रात्री घडली. दीपाली हिच्यावर तिच्या शाळेतील शिक्षकांनी अभ्यासाबाबत अतिशय जास्त मानसिक दडपण आणले होते. त्यांच्या याच दबावाला कंटाळून तिने आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेतला. दीपाली ही अग्रगामी हायस्कूलमधील हेकेखोरवृत्तीच्या शिक्षकांच्या दबावतंत्राचा बळी ठरल्याचा आरोप दीपालीची आई रश्मी जानवे यांनी केला आहे.प्राप्त माहितीनुसार, स्थानिक मुख्य मार्गालगत रहिवासी असलेली दीपाली जानवे हिचे प्राथमिक शिक्षण अग्रगामी शाळेतच झाले. त्यानंतर तिला पिपरी (मेघे) येथील अग्रगामी हायस्कूलमध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश मिळाला. सध्या ती तेथे नववीचे शिक्षण घेत होती.सदर घटनेच्या काही दिवसांपूर्वी अग्रगामी शाळेत पालक सभा घेण्यात आली. यावेळी जे विद्यार्थी शाळेच्यावतीने घेण्यात येणाºया परीक्षेत ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण घेत आहेत, अशा विद्यार्थ्यांच्या पालकांकडून शाळेच्या मुख्याध्यापिका दीपा जोसेफ यांच्या सूचनेवरून शाळेतील शिक्षकांनी ‘जर तुमच्या पाल्याने पुढील परीक्षेत ५० टक्क्यांच्यावर वर गुण घेतले नाही तर तुम्हाला तुमच्या पाल्याची टीसी देण्यात येईल’ अशा आशयाचा मजकूर पालकांकडून लेखी घेतला. यात मृतक दीपालीच्या पालकाचाही समावेश होता. त्यामुळे दीपाली ही काही दिवसांपासून अतिशय तणावात होती.अशातच नववीचे शिक्षण घेण्याºया दीपाली हिने गुरूवारी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दीपालीच्या आत्महत्येस शिक्षकांचे दबावतंत्र जबाबदार असून या प्रकरणी योग्य कारवाई करण्याची मागणी मृत दीपालीच्या कुटुंबीयांनी केली आहे. सदर घटनेची नोंद शहर पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.अन्य उपक्रमात राहायची पुढेशाळेच्यावतीने घेण्यात येणाºया सांस्कृतिक, खेळ स्पर्धा आदी उपक्रमात दीपाली ही स्वयंस्फूर्तीने भाग घेत होती. तिने आतापर्यंत कुठले असे मोठे पारितोषिक पटकाविले नसले तरी तिचा इतर उपक्रमातील सहभाग कौतुकास्पदच होता, असे सांगण्यात आले.शाळेला दिली सुटीदीपालीच्या आत्महत्येची वार्ता शाळेतील शिक्षकांना मिळताच शुक्रवारी शाळेला सुटी देण्यात आली होती.शाळेत पार पडलेल्या शिक्षक-पालक सभेत कमी गुण घेणाºया विद्यार्थ्यांच्या पालकांकडून लेखी मजकूर घेण्यात आला होता, हे जरी खरे असले तरी तो केवळ पालकांनी आपल्या पाल्याबाबत जागरूक व्हावा यासाठी होता. पूर्वीचा अभ्यासक्रम बदलला असून आता १०० गुणांसाठी विद्यार्थ्यांना लिहावे लागते. जे विद्यार्थी अभ्यासात कमजोर आहेत, त्यांच्यासाठी शाळेच्यावतीने अतिरिक्त विशेष वर्ग घेतले जातात. आम्ही चांगला विद्यार्थी घडावा यासाठी प्रयत्न करतो.- दीपा जोसेफ, मुख्याध्यापिका, अग्रगामी हायस्कूल, पिपरी (मेघे).दीपाली जानवे ही विद्यार्थिनी अभ्यासात कमजोर असली तरी ती शाळेच्यावतीने आयोजित करण्यात येणाºया इतर उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होत होती. तिने आतापर्यंत कुठलेही बक्षीस पटकाविले नसले तरी तिचा इतर उपक्रमातील सहभाग कौतुकास्पद होता.- डी. जी. मेहरे, वर्ग शिक्षक, अग्रगामी हायस्कूल, पिपरी (मेघे).

टॅग्स :Studentविद्यार्थीDeathमृत्यू