शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

उपचाराकरिता दिरंगाई, सर्पदंशाने महिलेचा मृत्यू; उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 17:14 IST

कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्याची मागणी

हिंगणघाट (वर्धा) : सर्पदंश झालेल्या महिलेवर तातडीने उपचार न करता काही वेळाने उपस्थित डॉक्टरांनी सेवाग्रामला पाठविले. परंतु, वाटेतच त्या महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे संबंधित डॉक्टरांवर कारवाई करून मृत सीमा मेश्राम यांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्याची मागणी सर्पमित्र प्रवीण कडू यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

पिंपळगाव (मा.) येथील किशोर मेश्राम यांच्या पत्नी सीमा मेश्राम या २३ मे रोजी घरकाम करत असताना त्यांना पायाला काहीतरी चावल्याचा भास झाला. त्याचवेळी पायाजवळून उंदीर गेला. चावा घेतलेल्या जागेवर खूप वेदना होत होती म्हणून त्यांना हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. येथील डॉक्टरांनी त्यांना औषध देऊन घरी परत पाठविले. त्या घरी परतल्यावर खूप अस्वस्थ वाटायला लागले आणि वेदनाही जास्त होऊन छातीत दाटल्यासारखे वाटायला लागले. म्हणून पुन्हा उपजिल्हा रुग्णालय गाठले. त्यांच्या पतीने डॉक्टरांना सर्व घटना सांगितली, पण डॉक्टरांनी लागलीच उपचार न करता काही वेळ थांबवून ठेवले. त्यानंतर सेवाग्रामच्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे खासगी रुग्णवाहिकेने त्यांना सेवाग्रामला आणत असताना वाटेतच सीमा यांचा मृत्यू झाला.

उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने उपचार न केल्यामुळे सीमा मेश्राम यांना जीव गमवावा लागला. त्यामुळे संबंधित डॉक्टरवर कारवाई करून नुकसानभरपाई देण्याची मागणी सर्पमित्र प्रवीण कडू, संदीप बंडावार, किशोर मेश्राम, मनोज सलामे, हरिश्चंद्र मेश्राम यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री, पालकमंत्री, आरोग्यमंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

घटनेच्या दिवशी सकाळी ९ वाजता संबंधित महिलेने उंदीर चावल्याचे सांगितल्याने टीटीचे इंजक्शन देऊन त्यांना घरी पाठविले. मात्र, दुपारी १२ वाजता त्यांना पुन्हा रुग्णालयात आणले तेव्हा जास्त वेदना होत होत्या. त्यांना छातीत दाटल्यासारखे वाटत होते. परंतु, साप चावल्याची हिस्ट्री नसल्याने साप चावल्याचे उपचार करता आले नाहीत. संबंधित महिला रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने सेवाग्रामला पाठविण्यात आले.

- डॉ. किशोर चाचरकर, अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, हिंगणघाट

टॅग्स :AccidentअपघातHealthआरोग्य