शहरं
Join us  
Trending Stories
1
हमासचा नवा प्रमुख याह्या सिनवारचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला; दातांनी ओळख पटली नाही म्हणून बोटांनी...
2
एकमेकांची वाट पाहण्यात सगळ्यांच्या उमेदवार याद्या लांबल्या; ही दोन कारणंही महत्वाची
3
जिंकलंस भावा! टीम इंडिया अडचणीत असताना मुंबईकर Sarfaraz Khan नं ठोकली सेंच्युरी
4
घासून निघालेल्या जागांचे काय? पाच हजार मताधिक्यांच्या आतील ३७ मतदारसंघांचे निकाल ठरणार अधिक महत्त्वाचे
5
सायकलस्वाराला वाचवताना भीषण अपघात, ५३ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कोसळली नदीत
6
"विलेपार्लेची जागा शिंदेगटाला सोडा", माजी मंत्री दीपक सावंत यांनी घेती जे. पी. नड्डा यांची भेट
7
ESIC बाबत सरकारचा मोठा निर्णय, PMJAY सोबत आणण्यास मंजुरी, कोणाला होणार फायदा?
8
आचारसंहितेमुळे योजनादूतांमार्फत प्रचार थांबवा; आयोगाची सूचना 
9
Rishabh Pant चुकला; त्याची विकेट वाचवण्यासाठी Sarfaraz Khan उड्या मारत ओरडताना दिसला
10
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे नेते"; पटोलेंच्या विधानावर राऊत म्हणाले, "त्यांच्या परवानगी शिवाय..."
11
पवार, फडणवीस यांच्या भेटीसाठी इच्छुकांची तोबा गर्दी
12
भारताने पाकिस्तानात खेळावे, रहायला खुशाल भारतात जावे; व्याकुळलेल्या शेजाऱ्याचा चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी पुन्हा नवा फॉर्म्युला
13
मविआत 'वाद' वाटप, चर्चा खोळंबली; राऊत-पटोले यांच्यात शाब्दिक वॉर, थेट दिल्ली दरबारी पोहोचली तक्रार!
14
बंगालच्या उपसागरात 'दाना' चक्रीवादळ, देशाच्या या भागात निर्माण होणार पूरस्थिती 
15
मुंबईत ठाकरे गटच मोठा भाऊ; समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा देणार
16
जगातील टॉप ५० कंपन्यांमध्ये भारतातील एकही नाही, कुठपर्यंत झाली Relianceची घसरण?
17
सलमान खानमुळे बाबा सिद्दीकींची हत्या झाली? सलीम खान म्हणाले, "त्याचा काही संबंध..."
18
दोन मुलांच्या मृतदेहांसह कुटुंब करत होतं धार्मिक विधी, शेजाऱ्यांनी बोलावले पोलीस, त्यानंतर...
19
आजचे राशीभविष्य - १९ ऑक्टोबर २०२४, कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील
20
सलमानने कधी झुरळही मारलेलं नाही! बिश्नोईच्या धमकीनंतर सलीम खान यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "त्याचं प्राण्यांवर प्रेम..."

नाफेडच्या तूर खरेदी केंद्राची मागणी

By admin | Published: February 16, 2017 1:26 AM

तालुक्याचे ठिकाण असलेल्या देवळी शहराशी मोठा ग्रामीण भाग जुळलेला आहे.

व्यापाऱ्यांकडून लूट : अल्प भावात होते तुरीची खरेदी देवळी/कोळोणा (चोरे) : तालुक्याचे ठिकाण असलेल्या देवळी शहराशी मोठा ग्रामीण भाग जुळलेला आहे. परिसरातील शेतकरीही येथे शेतमाल विक्रीसाठी आणतात. व्यापारी तुरीची अल्प भावात खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. यामुळे देवळी येथे नाफेडमार्फत तूर खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी कोळोणा व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. तूर काढणीला प्रारंभ झाला आहे. शेतकरी तूर विक्रीला आणत आहे. देवळीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडचे खरेदी केंद्र नाही. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. देवळी शहर ग्रामीण भागाशी जुळलेले असल्याने या भागातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल माल येथे विक्रीला आणणे परवडतो; पण नाफेडची खरेदी नसल्याने या भागातील शेतकऱ्यांना शेतमाल वर्धा, हिंगणघाट, यवतमाळ वा कळंब या ठिकाणी घेवून जावे लागते. या दूरच्या ठिकाणी माल घेऊन जाताना वाहतुकीचा दामदुप्पट खर्च करावा लागतो. पहिल्या दिवशी लिलाव न मिळाल्यास मुक्काम करावा लागतो. परिणामी, शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. देवळी शहरात व्यापाऱ्यांना तुरी विकल्यास अल्प भाव मिळतो. शेतकऱ्यांची आर्थिकता सावरायची असेल तर शासनाने तूर खरेदीसाठी नाफेडचे केंद्र सुरू करणे गरजेचे आहे. यातून शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक लाभ मिळू शकतो. शिवाय व्यापाऱ्यांकडून होत असलेल्या भाव पाडण्याच्या प्रक्रियेलाही लगाम बसेल. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे शासनाने त्वरित लक्ष देत नाफेडची तूर खरेदी सुरू करावी, अशी मागणी या भागातील शेतकरी नरेश ओंकार, नंदू भस्मे, प्रशांत मुनेश्वर, रवींद्र उपाशे, नितीन मानकर, गजानन मोडक, पद्माकर कांबळे, धम्मा कांबळे आदींनी केली.(प्रतिनिधी/वार्ताहर)