शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

देवळी अन् आर्वी ठरणार हॉट विधानसभा मतदारसंघ; मोर्शी, हिंगणघाट, धामणगाव, वर्धेकडे लक्ष 

By रवींद्र चांदेकर | Updated: April 11, 2024 17:47 IST

वर्धा लोकसभा मतदारसंघात वर्धा, देवळी, हिंगणघाट, आर्वी, मोर्शी आणि धामणगाव, या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

रवींद्र चांदेकर, वर्धा :वर्धा लोकसभा मतदारसंघात वर्धा, देवळी, हिंगणघाट, आर्वी, मोर्शी आणि धामणगाव, या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यात देवळी हा महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांचा, तर आर्वी हा महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांचा गृह मतदारसंघ आहेत. त्यामुळे हे दोन मतदारसंघ हॉट ठरणार आहेत. मोर्शी, हिंगणघाट, धामणगाव आणि वर्धा विधानसभा मतदारसंघाकडेही सर्वांचे लक्ष राहणार आहे.

गेल्यावेळी महायुतीच्या उमेदवाराला मोर्शी आणि हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्य होते. धामणगाव आणि देवळी मतदारसंघात सर्वांत कमी मताधिक्य होते. २०१९ च्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांना ५ लाख ७८ हजार ३६४, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवार चारुलता टोकस यांना ३ लाख ९१ हजार १७३ मते मिळाली होती. त्यांच्यात एक लाख ८७ हजार १९१ मतांचा फरक होता. त्यावेळी मोर्शी विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला ४८ हजारांच्या वर, तर हिंगणघाट विधानसभेत ३८ हजारांच्या वर मताधिक्य मिळाले होते. मात्र, महायुतीच्या उमेदवाराचा गृह मतदारसंघ असलेल्या देवळी विधानसभेत त्यांना केवळ १६ हजार, तर धामणगाव विधानसभेत केवळ १८ हजारांवर मताधिक्य मिळाले होते.

मागील निवडणुकीत आर्वी विधानसभेत भाजप उमेदवाराला २६ हजारांवर आणि वर्धा विधानसभेत ३७ हजारांवर मताधिक्य होते. यावेळी आर्वी आणि देवळी विधानसभा मतदारसंघ सर्वाधिक हॉट ठरणार आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार याच मतदारसंघातील आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष या दोन विधानसभा मतदारसंघांकडे राहणार आहे.

मागील निवडणुकीत आर्वीत महायुती आणि काँग्रेस उमेदवाराच्या मतांमध्ये केवळ २६, तर वर्धेत ३७ हजारांच्या वर मतांचा फरक होता. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत हा फरक कमी झाला होता, हे विशेष.मागील विधानसभा निवडणुकीत महायुती आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये तर केवळ ७ हजार ९३३ मतांचा फरक होता. त्यामुळे यावेळी आर्वी, देवळीसह वर्धा विधानसभा मतदारसंघात लोकसभेसाठी काट्याची टक्कर होण्याचे संकेत आहेत.

काँग्रेस आमदारांची प्रतिष्ठा पणाला-

महायुतीचे उमेदवार देवळी विधानसभा मतदारसंघातील आहेत. मात्र, या मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये तुल्यबळ सामना होण्याचे संकेत आहेत. या विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे आमदार या दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यात कोण बाजी मारते, यावर पुढील विधानसभा निवडणूक अवलंबून असणार आहे.

४० ते ४९ वयोगटातील मतदार निर्णायक-

जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांत १० लाख ८९ हजार ७१८ मतदार आहेत. यात ४० ते ४९ वयोगटातील सर्वाधिक दोन लाख ४६ हजार ४४ मतदार आहेत. ३० ते ३९ वयोगटातील दोन लाख ३० हजार २०५ मतदार आहेत. त्या खालोखाल २० ते २९ वयोगटातील एक लाख ८८ हजार ७३२, तर ५० ते ५९ वयोगटातील एक लाख ८७ हजार आठ मतदार आहेत. हे सर्व मतदार या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत. याशिवाय १८ ते १९ वयोगटातील १७ हजार ५०८ नवमतदार आहेत.

टॅग्स :wardha-acवर्धाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४