शहरं
Join us  
Trending Stories
1
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
2
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
3
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
4
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
5
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
6
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
7
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
8
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
9
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
10
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
11
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
13
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
14
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
15
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
16
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
17
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
18
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

अन् गणपतीला निरोप देत शेतकऱ्यानेही घेतला जगाचा निरोप

By चैतन्य जोशी | Published: September 10, 2022 4:12 PM

अंबोडा येथील घटनेने खळबळ : देवळी पोलिसांनी घेतली नोंद    

वर्धा : नापिकी व कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारी पातळीवरुन अनेक उपाययोजना सुरु आहेत. मात्र, तरीही शेतकरी आत्महत्या थांबत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. अशीच एक घटना देवळी तालुक्यातील अंबोडा गावात शुक्रवारी ९ रोजी घडली आहे. कर्जबाजारी शेतकऱ्याने गणपती विसर्जनानंतर स्वत:ही जगाचा निरोप घेतला. या घटनेने अंबोडा गावात एकच खळबळ उडाली. 

गुणवंता अजाब मडावी (६०) रा. अंबोडा असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. गुणवंताकडे दोन एकर शेत आहे. मात्र, सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे तो नेहमी विवंचनेत राहत होता. कर्जाची रक्कम फेडावी तरी कशी हा मोठा प्रश्न त्याच्यापुढे उभा होता. शेतीसाठी काढलेले कर्ज, उत्पादन दिसत असले तरी शेतमालाचे न परवडणारे दर, नापिकी व इतर कारणांमुळे गुणवंता त्रस्त होता.

शुक्रवारी लहान भाऊ रमेश मडावी याच्याकडील गणपती विसर्जन असल्याने सर्व कुटुंबीय सकाळी ११ वाजताच्या सुमारास एका शेतातील शेततळ्यावर गणपती विसर्जनासाठी गेले होते. लगतच गुणवंताचे शेत असल्याने तो शेतात होता. बाप्पाला निरोप देऊन सर्व कुटुंबिय घरी परतले. मात्र, गुणवंताने बाप्पाच्या विसर्जनानंतर त्याच शेततळ्यात उडी घेत जगाचा निरोप घेतला. शनिवारी १० रोजी सकाळच्या सुमारास गुणवंताचा मृतदेह तळ्याबाहेर काढण्यात आला. देवळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांनी घटनास्थळी जात पंचनामा करुन मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठविला. चार दिवसांपूर्वी दिली होती नोटीस 

मृतक गुणवंता याच्यावर गिरोली येथील स्टेट बॅंकेचे कृषी कर्ज होते. चार दिवसांपूर्वीच बॅंकेतील कर्मचारी गुणवंताच्या घरी आले होते. त्यांनी नोटीसही बजावली होती. तेव्हापासूनच गुणवंता विवंचनेत होता. त्याच विवंचनेतून त्याने आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलले. आकस्मिक मृत्यूची नोंद 

गुणवंता मडावी याच्यावर कृषी कर्ज होते. याच विवंचनेतून त्याने आत्महत्या केली. ९ रोजी दुपारपासून मृतदेह तळ्याबाहेर काढण्याचे काम सुरु होते.  पोलीस अधीक्षक कार्यालयातील रेस्क्यू पथकही बोलाविण्यात आले होते. अखेर १० रोजी सकाळी गुणवंताचा मृतदेह मिळून आला. पोलिसांनी याप्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्जagricultureशेती