शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
2
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
3
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
4
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
5
सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?
6
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
7
भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, सौदीहून परतलेल्या पतीला संपवलं; मृतदेह बॅगेत भरला अन्...
8
'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज
9
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
10
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
11
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
12
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा
13
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
14
बीडची बिहारच्या दिशेनं वाटचाल, माजलगावात बिलाच्या कारणावरून ढाबा मालकाची हत्या
15
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
16
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
17
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
18
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
19
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
20
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?

शेतातून बोरांची झाडे झाली हद्दपार... गावरान बोरं कशी खायला मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 17:45 IST

गावरान बोरांचे नाव जरी काढले तरी तोंडाला पाणी सुटते, अशी या गावरान बोरांची ख्याती प्राप्त आहे; पण काळाच्या ओघात ही बोरं लुप्त पावत चालली आहेत.

वर्धा : दिवाळीच्या काळात मिळणारी गावरान बोरं अलीकडे दिसेनाशी झाली आहेत. संकरित आणि मोठ्या आकारांच्या बोरांनी बाजारपेठ व्यापली आहे. मात्र गावरान बोरांची मजा यात नाही.

गावरान बोरांचे नाव जरी काढले तरी तोंडाला पाणी सुटते, अशी या गावरान बोरांची ख्याती प्राप्त आहे; पण काळाच्या ओघात ही बोरं लुप्त पावत चालली आहेत. पूर्वीच्या काळी ग्रामीण भागासह शहरी भागातही फक्त गावरान पेवंदी व बारीक बोरच मिळत असे; पण आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारच्या बोरांच्या जाती निर्माण करण्यात आल्या खऱ्या पण यात गावरान बोरांची मजा बिल्कुलच नाही हे मात्र खरं.

पूर्वी बऱ्याच शेतात बोरं, आंबा,बाभूळ आदी झाडांचे बन मोठ्या प्रमाणात असायचे. शेतकऱ्यांकडून यांचे योग्य संगोपन केले जायचे; पण वाढत्या लोकसंख्येमुळे मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली गेली. यामध्ये गावरान बोरांचीही झाडे नष्ट करण्यात आली. तरी पण अनेक शेतकऱ्यांनी बोरांची झाडे जोपासली आहेत,यामुळे ग्रामीण भागात अजूनही गावरान बोरं चाखायला मिळतात,

१) *किलोला २५ रुपयांचा भाव*

एकेकाळी गावरान बोरांना काहीही किंमत नसायची मोठ्या प्रमाणात ही बोरं फेकली जायची. ग्रामीण भागातील मुलं बोरं गोळा करून ते वाळवत टाकून बोरकूट करायचे,पण आता तसे राहिले नाही.बोरांची झाडंही कमी झालीत आणि मुलंही व्यस्त झाली आहेत. यामुळे आज या बोरांचा भाव किलोला २५ रुपये झाला आहे,

२) यंदा ॲपल बोरही मिळेना

ही बोरं सफरचंदाच्या आकाराची असल्याने याला ॲपल बोर म्हटले जाते,याचे उत्पादन अधिकतर पंढरपूर भागात मोठ्या प्रमाणात घेतले जाते,पण यावर्षी परतीच्या पावसामुळे बोर पिकांचे मोठे नुकसान झाले, तसेच डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्चही महागला यामुळे ॲपल बोर फार कमी प्रमाणात येईल.

३) शेतातून बोरांची झाडे गायब

माझ्या शेतात गावरान पेवंदी व बारीक बोरांची बरीच झाडे होती; पण दीर्घकालावधीमुळे ती जीर्ण झालीत व नष्ट झाली,तरी पण काही झाडे जोपासली आहेत, यामुळे आजही गावरान बोरं चाखायला मिळतात.

बाबा शेख, शेतकरी

वाढत्या लोकसंख्येमुळे ठिकठिकाणी घरं बांधण्यात आली व बरीच पडीक जमीन वाहितीखाली आली यामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल झाली आणि आता शेतात जी झाडे आहेत त्यामुळे माकडांचा त्रास उभ्या पिकांना होत आहे. यामुळे झाडं तोडणे सुरू आहे. बोरींच्या झाडासह इतरही झाडे नष्ट होत आहेत तरीपण आंब्याच्या व बोरांच्या झाडांचे जतन केले जाते.

राजेंद्र होरे, शेतकरी

टॅग्स :agricultureशेतीenvironmentपर्यावरण