शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
2
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
3
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
4
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
5
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
6
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
7
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
8
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
9
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
10
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
11
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
12
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
13
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
14
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
15
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
16
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
17
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
18
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
19
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
20
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात

पाणी बदलाने डायरियाचे रुग्ण वाढले

By admin | Published: July 08, 2017 12:05 AM

पावसाळा येताच पाण्यातील बदलामुळे जिल्ह्यात डायरीयाचे रुग्ण वाढत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्र

पाणी उकळून पिण्याचा सल्ला : खासगीसह प्राथमिक आरोग्य केंद्र फुल्ल लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : पावसाळा येताच पाण्यातील बदलामुळे जिल्ह्यात डायरीयाचे रुग्ण वाढत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खासगी रुग्णालयातही गर्दी आहे. यात चिमुकल्यांची संख्या अधिक असून काही ज्येष्ठांचाही समावेश आहे. यामुळे नागरिकांनी वेळीच जागरूक होत आरोग्याची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पाण्यामुळे उद्भवत असलेल्या या आजारावर आळा बसविण्याकरिता नागरिकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. नळांना अथवा विहिरींना आलेले पाणी उकळून थंड करून पिणे गरजेचे आहे. दूषित पाण्याचा सर्वाधिक प्रभाव चिमुकल्यांच्या आरोग्यावर होत असल्याचे दिसून आले आहे. सोबतच बदलत्या वातावरणामुळे अनेकांना व्हायरल फिवरनेही ग्रासल्याचे दिसून आले आहे. व्हायरल फिवरची लागण झाल्यास पालकांनी त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठविण्याचे टाळावे. एकापासून इतर बालकांना फिवरची लागण होत असल्याचे बालरोग तज्ज्ञांनी सांगितले आहे. दूषित पाणी पिल्याने डायरीया होत असल्याचे शास्त्रीय कारण आहे. वर्धा शहरासह ग्रामीण भागात होणारा पाणी पुरवठा हा नियमानुसार शुद्धीकरण करून होतोच असे नाही. होत असलेल्या पाणी पुरवठ्याच्या तुलनेत जिल्ह्यात शुद्धीकरणाची सुविधा तोकडी असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरात कालबाह्य झालेल्या शुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा होत आहे. यातच पालिकेच्या नळाचे पाईप फुटून त्यातूनही दूषित पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता आहे. जलरक्षकांची जबाबदारी वाढली शहरात अथवा गावात पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांना सोपविण्यात आली आहे. शहरात नगर परिषद आणि गावात ग्रामपंचायतीची नळयोजना आहे. या योजनेतून शुद्ध पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी त्यांची आहे. होणारा पाणी पुरवठा शुद्ध आहे अथवा नाही याची तपासणी करण्याचे काम जलरक्षकांचे आहे. त्यांच्याकडून पाण्याची तपासणी करणे गरजेचे आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने होत असलेला पाणी पुरवठा तपासून त्याची माहिती संबंधितांना देत त्यावर उपाययोजना आखण्याच्या सूचना करणे अपेक्षित आहे. ग्रामपंचायतींनी ब्लिचिंग पावडर टाकावे गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी अथवा इतर स्त्रोतात ग्रामपंचायतीने ब्लिचिंग पावडर टाकून पाण्याचे निर्जंतूकीकरण करणे गरजेचे आहे. ब्लिचिंग पावडर खरेदीचे अधिकारी ग्रामपंचातींना मिळाले असल्याने त्यांच्याकडून गावाच्या आरोग्याच्या सुरक्षेकरिता हा निर्णय स्वत: घेणे गरजेचे झाले आहे. पाण्याच्या बदलामुळे डायरीयाची लागण होते. यामुळे नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी. प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व ओषधांचा साठा पोहोचविण्यात आला आहे. नागरिकांनी घरगुती उपाय करण्यापेक्षा रुग्णालयात जावे. - डॉ. दुर्योधन चव्हाण, जिल्हा आर्रोग्य अधिकारी. पावसाळ्याच्या दिवसात पाण्यात होत असलेल्या बदलामुळे डायरीयाची लागण होत असल्याचे वाढत असलेल्या रुग्णसंख्येवरून दिसत आहे. पाण्याच्या बदलाचा विशेष परिणाम चिमुकल्यांवर होत आहे. यामुळे पालकांनी पाणी उकळून आणि गरम करून प्यावे. सोबतच बदलत्या वातावरणामुळे व्हायरल फिवरचे रुग्णही वाढत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे पालकांनी तापाची लागण होताच मुलाला शाळेत पाठवू नये. अशा बालकांमुळे इतरांनाही त्याची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. - डॉ. सचिन पावडे, बालरोग तज्ज्ञ, वर्धा. जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रत्येक वॉर्डात डायरीयाची लागण झालेले रुग्ण उपचार घेत आहे. पाण्याच्या बदलामुळे हा आजार होतो. शिवाय नागरिकांनी उघड्यावरील पदार्थ खाणे टाळत पाण्याचे शुद्धीकरण करून ते पिणे गरजेचे आहे. - डॉ. निवृत्ती राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक .