शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कपाशीवर रोग, पाने पिवळी पडली; शेतकऱ्यापुढे नवे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 17:28 IST

उत्पादनात घट होण्याची शक्यता : उपाययोजना सुचविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क सेलू : तालुक्यातील अनेक गावांत जोमात वाढलेल्या कपाशीवर रोग आला आहे. सततच्या पावसामुळे कपाशी पीक पिवळे पडले असल्याचा अंदाज जाणकारांचा अंदाज आहे. आणखी पाऊस आल्यास हे पीक हातचे जाण्यासह उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तालुक्यात हजारो हेक्टरवर कपाशी पिकांची लागवड करण्यात आली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस पडला नसल्याने पेरण्यांना विलंब झाला. पेरणीनंतर तुरळक झालेल्या पावसाने कपाशी पिकांनी तग धरला. तर ज्याच्याकडे ओलिताची सोय होती त्यांनी ओलित करून कपाशी जगविली. तर कोरडवाहू शेतकऱ्यांनी ४० टक्क्यांपर्यंत डोब आली होती. त्यानंतर झालेल्या समाधानकारक पावसाने पिकांना नवसंजीवनी मिळाली होती. मात्र, त्यानंतर लागून पडलेल्या पावसाने पिकांची पुरती वाट लावली. सध्या घडला कपाशी फुले पात्यावर आहेत. असे असताना परतीच्या पावसाचा फटका तालुक्याला बसला आहे. 

दिवसा ऊन, रात्री ढगाळ वातावरण असल्याने शेतात शेवाळ निर्माण झाले. परिणामी कपाशीचे पीक पिवळे पडत आहे. हे वातावरण कीड, रोगांना पोषक ठरत असून, रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. कपाशीवर बोंडअळी तर आलीच रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भावही वाढला आहे; तणनाशके निष्प्रभावी ठरत असल्याने पिकांमध्ये तण प्रचंड वाढले आहे. कीड, रोग, शेतातील तणांचे व्यवस्थापन, नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकरी जहाल, अत्यंतिक विषारी कीटकनाशके फवारणी करीत आहे. परिणामी शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे. असे असताना अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करीत उपाययोजना सुचवाव्यात, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

मार्गदर्शन करण्याची मागणी दरवर्षी कपाशीवर व सोयाबीनवर काही ना काही रोग येतो. यंदाही कपाशीवर रोग आला आहे. पाने पिवळी पडत आहे. यंदा जमिनीत चांगल्या पावसामुळे ओलेपणा कायम आहे व ऊनही चांगले तापत आहे. त्यामुळे कदाचित कपाशीवर रोगांनी अटॅक केल्याची शक्यता नाकारता येत नाही. कपाशीची पाने पिवळी पडल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. वळीच उपायोजना झाल्या नाही तर हातचे पीक जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेळीच मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.

संकटाशी दोन हात हंगामात अतिवृष्टी आणि आता परतीच्या पावसाने खरीप पिकांचे नुकसान केले. यात कपाशीवर आलेल्या कीडरोगाने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली असून उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. लागवडीला लागलेला खर्च आणि बाजारात मिळणारा हमीभाव यात मोठी तफावत असल्याने संकटाशी दोन हात करताना शेतकऱ्यांच्या आता जिव्हारी लागत असल्याचे बोलले जात आहे.

दिवाळी सणही फिकाच दिवाळी सनापूर्वी खरिपातील पीके निघण्यास सुरवात होते. यंदा सोयाबिनने दगा दिला. त्यात भाव पाडून व्यापारी शेतमालाची खरेदी करीत आहे. त्यामुळे दिवाळी सारखा सण सूनाच जाण्याची चिन्ह दिसून येत आहे. लेकी बाळीला चोरी बांगडी घेण्यासाठी उधार घेण्याची वेळ ओढावली आहे.

टॅग्स :wardha-acवर्धाcottonकापूसAgriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेती