शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
2
ठाकरे की शिंदे कोण वरचढ ठरणार? २६ मतदारसंघात थेट लढत; उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर!
3
सपाच्या बालेकिल्ल्यात घमासान, अखिलेश यादवांच्या भाओजींनाच भाजपानं दिली उमेदवारी
4
Salman Khan : "तो खूप घाबरला होता, आम्ही बिस्किट खायला दिलं अन्..."; सलमानने सांगितला किस्सा
5
"एखाद्या ट्रकखाली येऊन माझा मृत्यू झाला तर...", वैतागलेल्या अभिनेत्याने सांगितली घोडबंदर रस्त्याची भयानक परिस्थिती
6
INDW vs NZW : पहिल्याच सामन्यातून भारतीय कर्णधार बाहेर; स्मृतीकडे नेतृत्व, २ खेळाडूंचे पदार्पण
7
ऑटो इंडस्ट्र्रीतील मोठ्या डीलची तयारी! महिंद्रा १ अब्ज डॉलर मोजून ५० टक्के हिस्सा खरेदी करणार, 'ही' कंपनी तयार?
8
३५ ऐवजी २० गुण मिळाले तरी व्हाल पास; दहावीच्या गणित, विज्ञानासाठी पुढील वर्षी नवीन नियम
9
“तुतारीला मोठे यश मिळेल, राज्यात मविआची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही”: हर्षवर्धन पाटील
10
केवळ गंमत म्हणून पाठवला सलमानला धमकीचा संदेश; झारखंडमधून एकाला बेड्या
11
"मोठी डील झालीय"; तिकीट कापल्यानंतर चंद्रिकापुरेंचे थेट पत्र; म्हणाले, "अजित पवारांनी खंजीर खुपसला"
12
IND vs NZ : Sarfaraz Khan नं टणाटण उड्या मारत कॅप्टन रोहितला DRS साठी केलं 'राजी' 
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'शरद पवारांचा मला दुरून आशीर्वाद', अजित पवार गटातील नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
14
अंबानी डोक्यालाच हात लावणार! पठ्ठ्याने JioHotstar डोमेनच स्वत:च्या नावावर केला; वर म्हणाला,'संपर्क साधा' 
15
“मित्रपक्षांना चालत नाही, तो चेहरा राज्याला कसा चालेल”; CM शिंदेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
16
एकाच मतदारसंघातून सलग ५ वेळा निवडणूक लढविणाऱ्या एकमेव महिला, दोनदा यश, तीनदा अपयश
17
"यांच्या स्वभावातच कोणाशी..."; वांद्रे पूर्वमध्ये उमेदवार देताच ठाकरेंवर झिशान सिद्दीकींची खोचक पोस्ट
18
₹९०० पर्यंत जाऊ शकतो Paytm चा शेअर, ५ महिन्यांत १२०% ची तेजी; शेअर वधारला
19
Salman Khan : सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी देणारा निघाला भाजीवाला, मागितलेले ५ कोटी
20
नागिणीने घेतला खुनी बदला, एकापाठोपाठ एक ५ जणांना दंश केला, ३ जणांचा मृत्यू

संकटकाळात झाले ‘रेकॅार्ड ब्रेक’ पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 5:00 AM

खरीब किंवा रबी हंगामाच्या सुरुवातीला शेतकरी विविध बँकांचे उंबरठे झिजवून पीककर्ज मिळवितात. पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याला त्यासाठी सुरुवातीला विविध कार्यालयात जावून आवश्यक कागदपत्र गोळा करावे लागतात. हीच कागदपत्रं सादर केल्यावर कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यावर यापूर्वी कुठले कर्ज आहे काय, याची शहानिशा केल्यावरच त्याला पीककर्ज योजनेस पात्र ठरवून त्याच्या बँक खात्यात कर्जाची रक्कम वळती केली जाते.

ठळक मुद्देमहात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेचा परिणाम : ७० हजार १५१ शेतकऱ्यांना मिळाले ७३८.९४ कोटी

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : मागील सहा आर्थिक वर्षांचा विचार केल्यास यंदाच्या आर्थिक वर्षात जिल्ह्यात सर्वाधिक पीककर्ज वितरित झाल्याची नोंद अग्रणी बँकेने घेतली आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जिल्ह्यातील ७० हजार १५२ शेतकऱ्यांना विविध बँकांकडून पीककर्ज म्हणून ७३८.९४ कोटींची रक्कम वितरीत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यंदा कर्जमुक्तीची प्रभावी अंमलबजावणी झाल्यानेच सर्वाधिक पीककर्ज वितरित झाल्याचे सांगण्यात आले.खरीब किंवा रबी हंगामाच्या सुरुवातीला शेतकरी विविध बँकांचे उंबरठे झिजवून पीककर्ज मिळवितात. पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याला त्यासाठी सुरुवातीला विविध कार्यालयात जावून आवश्यक कागदपत्र गोळा करावे लागतात. हीच कागदपत्रं सादर केल्यावर कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यावर यापूर्वी कुठले कर्ज आहे काय, याची शहानिशा केल्यावरच त्याला पीककर्ज योजनेस पात्र ठरवून त्याच्या बँक खात्यात कर्जाची रक्कम वळती केली जाते. जिल्ह्यात अडीच लाखांच्यावर शेतकरी असून, बहुतांश शेतकरी राष्ट्रीयीकृत बँकेकडून पीक कर्ज घेतात. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये वर्धा जिल्ह्याला पीककर्ज वाटपाचे १०२८.९६ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यातील विविध बँकांनी जिल्ह्यातील तब्बल ७० हजार १५२ शेतकऱ्यांना पीककर्जापोटी ७३८.९४ कोटींची रक्कम वितरित केली आहे. विशेष म्हणजे यंदाच्या आर्थिक वर्षात कोरोनामुळे अनेकांचे कंबरडे मोडले असताना पीककर्ज वेळीच मिळाल्याने दिलासा मिळाला.

अन् कर्जखाते झाले निल महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्तीची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी झाल्याने अनेक कर्जबाजारी शेतकऱ्यांचे बँक खाते वेळीच निल झाले. अशातच रितसर अर्ज सादर करून अनेक शेतकऱ्यांनी पीककर्जाची मागणी केली. शेतकऱ्यांवर कुठलाही कर्जाचा बोझा न राहिल्याने बँकांनाही शेतकऱ्यांना पीककर्ज वेळीच वितरित करता आल्याचे सांगण्यात आले. 

५२ हजार शेतकऱ्यांना मिळाला कर्जमुक्तीचा लाभमहाविकास आघाडी सरकारने जाहीर करीत प्रत्यक्ष कृतीत आणलेल्या महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा जिल्ह्यातील तब्बल ५२ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. तशी नोंदही जिल्हा प्रशासनातील जिल्हा उपनिबंधक विभागाने घेतली आहे.

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी झाली. इतकेच नव्हे तर बँकांकडून एकाच वेळी कर्जाच्या परतफेडबाबत विविध योजना राबविण्यात आल्या. या दोन्ही बाबींमुळे शेतकऱ्यांकडील थकीत कर्ज मोठ्या प्रमाणात निल झाले. त्यामुळेच यंदा पीककर्ज योजनेच्या लाभासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी पात्र ठरले. फेब्रुवारी अखेरपर्यंत ७० हजार १५२ शेतकऱ्यांना पीककर्जापाेटी ७३८.९४ कोटींची रक्कम वितरित करण्यात आली आहे.- वैभव लहाने, प्रबंधक, अग्रणी बँक, वर्धा.

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज