शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
4
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
5
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
6
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
7
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
8
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
9
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
10
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
11
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
13
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
14
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
15
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
16
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
17
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
18
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
19
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
20
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर

अकरा शासकीय रुग्णालयांत 'कफ सिरप'चा दुष्काळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2022 21:24 IST

जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यक्षेत्रात वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, आर्वी व हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालय तसेच आठ ग्रामीण रुग्णालये येतात; पण मागील साडेतीन वर्षांपासून जिल्ह्याच्या स्थळी असलेल्या औषध भांडाराला वारंवार मागणी करून कफ सिरपचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयासह दोन उपजिल्हा रुग्णालय तसेच आठ ग्रामीण रुग्णालयात सध्याच्या स्थितीत कफ सिरपचा दुष्काळच निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अधिनस्त असलेल्या जिल्ह्यातील तब्बल अकरा शासकीय रुग्णालयांत मागील साडेतीन वर्षांपासून 'कफ सिरप'चा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे गरजू व गरीब रुग्णांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खोकल्याच्या औषधाच्या पुरवठ्याकडे संबंधित दुर्लक्ष करण्यात धन्यता मानत असले तरी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन तडस उंटावरून शेळ्या हाकलत असल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाईकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यक्षेत्रात वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, आर्वी व हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालय तसेच आठ ग्रामीण रुग्णालये येतात; पण मागील साडेतीन वर्षांपासून जिल्ह्याच्या स्थळी असलेल्या औषध भांडाराला वारंवार मागणी करून कफ सिरपचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयासह दोन उपजिल्हा रुग्णालय तसेच आठ ग्रामीण रुग्णालयात सध्याच्या स्थितीत कफ सिरपचा दुष्काळच निर्माण झाला आहे. कफ सिरपच्या दुष्काळामुळे शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांवर विश्वास ठेवून आरोग्य सेवा घेण्यासाठी शासकीय रुग्णालयात येणाऱ्या गरीब व गरजूंना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. परिणामी, या प्रकरणी आरोग्य यंत्रणेतील बड्या अधिकाऱ्यांनी लक्ष देत वेळीच योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.

किमान ७५८ औषधांची झाली मागणी- यंदा मे २०२२ मध्ये आवश्यक औषधांची मागणी संबंधितांकडे नोंदविण्यात आली. या औषधांमध्ये सुमारे ७५८ औषधांचा समावेश आहे. त्यापैकी सुमारे १०८ औषधांचा पुरवठा आतापर्यंत झाला असला तरी त्यात कप सिरपचा समावेश नाही. त्यामुळे या प्रकरणी आता आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.

संबंधितांचे वार्षिक मागणीकडेही दुर्लक्ष- जिल्हा सामान्य रुग्णालयातील मुख्य औषध भांडार प्रशासनाकडून प्रत्येक वर्षी मे महिन्यात गरज भासणाऱ्या औषधांची वार्षिक मागणी नोंदविली जाते. गत साडेतीन वर्षांत नोंदविण्यात आलेल्या मागणीत कफ सिरपचाही समावेश आहे; पण कफ सिरपचा पुरवठा करण्याकडे संबंधित दुर्लक्षच करीत आहे. तर जिल्हा शल्यचिकित्सक वरिष्ठांना कफ सिरपची गरज का हे पटवून देण्यात असमर्थ ठरत असल्याची चर्चा सध्या होत आहे.

शासकीय डॉक्टर अन् आरोग्य कर्मचाऱ्यांवर अनेकांचा विश्वास- जिल्हा सामान्य रुग्णालय असो वा उपजिल्हा रुग्णालय तसेच जिल्ह्यातील विविध भागातील ग्रामीण रुग्णालये या ठिकाणी कार्यरत असलेल्या डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांवर अनेकांचा विश्वास आहे. त्यामुळे या शासकीय रुग्णालयांत आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मागील केवळ सहा दिवसांचा विचार केल्यास वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ४ हजार २५८ नागरिकांनी बाह्य रुग्णसेवेचा लाभ घेतल्याचे वास्तव आहे. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल