शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

लेटलतिफीमुळे 'धाम' अमृतवाहिनी होण्याचा 'सूक्ष्म आराखडा' अपूर्ण !

By महेश सायखेडे | Updated: May 31, 2023 11:46 IST

अधिकारी गंभीर नाहीच : धाम नदी करते वर्धासह परिसरातील १३ गावांची तृष्णातृप्ती

महेश सायखेडे

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील तीन नदींसह राज्यातील १०७ नदी अमृतवाहिनी व्हाव्यात या हेतूने चला जाणूया नदीला हे अभियान शासनाने हाती घेतले आहे. या अभियानाचा श्रीगणेशा राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा जिल्ह्यातून झाला. या अभियानात जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरासह परिसरातील तेरा गावांची तृष्णातृप्ती करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या धाम नदीचा समावेश आहे. शिवाय वर्धा जिल्ह्यातीलच यशोदा आणि वणा नदीचाही समावेश करण्यात आला आहे. धाम नदीची संवाद यात्रा नुकतीच पूर्ण झाली; पण तब्बल २५ विभागांच्या अधिकाऱ्यांच्या लेटलतिफीमुळे 'धाम' नदी अमृतवाहिनी होण्याचा 'सूक्ष्म आराखडा' सध्या अपूर्ण आहे.

वर्धा तालुक्यातील पवनार येथे धाम नदीच्या तीरावर आचार्य विनोबा भावे यांचे आश्रम असून या नदीला ऐतिहासिक महत्त्वही आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील ही नदी प्रामुख्याने अमृतवाहिनी व्हावी अशी अपेक्षा अनेकांना आहे; पण संबंधित २५ विभागांचे अधिकारी दुर्लक्षित धोरण राबविण्यात धन्यता मानत असल्याने जिल्हा प्रशासनानेही कठोर भूमिका घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

दीड महिन्यात झाली धामची संवाद यात्रा पूर्ण

धाम नदी संवाद यात्रेला कारंजा तालुक्यातील धामकुंड येथून २० मार्चला सुरूवात झाली. धाम नदीच्या काठावरील तब्बल ४५ गावांत ही यात्रा जात सुमारे दीड लाख नागरिकांना प्रदूषणमुक्त धाम नदीचे महत्त्व पटवून देण्यात आले. या संवाद यात्रेचा समारोप ३ मे रोजी समुद्रपूर तालुक्यातील सुजातपूर येथे झाला असला तरी अद्यापही आवश्यक माहिती संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी नदी प्रहरीला दिली नसल्याने धाम अमृतवाहिनी होण्याचा सूक्ष्म आराखडाच तयार झालेला नाही.

जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रांनाही पाठ

संबंधित २५ विभागांच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे असलेली धाम नदीबाबतची आवश्यक माहिती नदी प्रहरीला द्यावी. शिवाय तातडीने सूक्ष्म आराखडा तयार करीत तो शासनाला सादर करता येईल यासाठी विशेष प्रयत्न करावे अशा आशयाचे पत्र या २५ विभागांच्या अधिकाऱ्यांना खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे; पण जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राला संबंधित अधिकारी केराची टोपली दाखविण्यात धन्यता मानत आहेत.

धाम नदी प्रहरी म्हणून दोन तज्ज्ञ सांभाळताहेत जबाबदारी

ज्येष्ठ वृक्षमित्र तथा निसर्ग प्रेमी मुरलीधर बेलखोडे आणि जलतज्ज्ञ माधव कोटस्थाने यांच्याकडे धाम नदीची प्रहरी म्हणून जबाबदारी आहे; पण त्यांनाही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

धाम नदी समन्वयक म्हणून बरीच मदत आम्हाला मिळाली आहे. सततच्या पाठपुराव्यानंतर निम्म्याहून अधिक माहिती प्राप्त झाली आहे. लवकरच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना धाम नदी अमृतवाहिनी होण्याचा सूक्ष्म आराखडा जिल्हाधिकाऱ्यांना सादर करू.

- मुरलीधर बेलखोडे, प्रहरी, धाम नदी.

टॅग्स :Socialसामाजिकwardha-acवर्धा