शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

अभियांत्रिकीवर प्रवेशाची दिवाळखोरी

By admin | Published: July 14, 2017 1:26 AM

प्रतिष्ठेचा आणि नोकरीची हमी असलेला अभ्यासक्रम म्हणून ओळख असलेल्या अभियांत्रिकीवर प्रवेशाची दिवाळखोरी आली आहे.

रूपेश खैरी । लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रतिष्ठेचा आणि नोकरीची हमी असलेला अभ्यासक्रम म्हणून ओळख असलेल्या अभियांत्रिकीवर प्रवेशाची दिवाळखोरी आली आहे. या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्यांचा नकार येत असल्याने महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर आली आहेत. अभियांत्रिकीकरिता असलेल्या केंद्रियभूत प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा पार पडला असून वर्धेतील तब्बल ६९ टक्के जागा रिक्त आहेत. हे अंतिम चित्र नसून चौथ्या फेरीनंतर रिक्त जागांचे खरे चित्र समोर येणार आहे. विविध अभ्यासक्रमांची महाविद्यालये असलेल्या वर्धेची ओळख एज्युकेशन हब म्हणून होत असताना येथे शिष्यवृत्ती घोटाळ्याची मुळे रोवल्या गेली. परिणामी विद्यार्थ्यांचा येथील महाविद्यालयांवरचा विश्वास उडाला. प्रवेशाअभावी वर्धेत अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या घटली. पूर्वी १० महाविद्यालये असलेल्या वर्धेत जुने सात एक नवे असे एकूण आठ महाविद्यालये आहेत. ही आठ महाविद्यालये मिळून केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रियेतून एकूण २,३०७ जागा भरावयाच्या आहेत. केवळ अग्निहोत्री अभियांत्रिकी महाविद्यालय आणि आर.व्ही. पराडकर कॉलेज आॅफ इंजिनिअरींगने दोनच महाविद्यालयाने संस्थेचा कोटा ठेवला असून इतर महाविद्यालयांनी तो जमा केला आहे. एकीकडे तंत्रशिक्षण मंडळाने दिलेल्या जागा रिक्त असताना या व्यवस्थापन कोट्यात कोण प्रवेश घेईल अशी स्थिती आहे. या व्यवस्थापन कोट्याच्या माध्यमातून होत असलेल्या प्रवेशावरच शिष्यवृत्तीचा घोळ कायम आहे. आतापर्यंत एकूण ७१० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून तोही निश्चित नसल्याचे चित्र आहे. महाकाली शिक्षण संस्थेचे दुसरे महाविद्यालयही बंद होण्याच्या मार्गावर वर्धेत असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी बाबुलालजी अग्निहोत्री कॉलेज आॅफ इंजिनिअरींग विद्यार्थ्यांच्या प्रवेशांअभावी बंद पडले आहे. आता याच कारणाने त्यांचे अग्निहोत्री कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगही बंद पडण्याच्या मार्गावर आहे. या महाविद्यालयात २४० जागा असून केवळ १३ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. तर आर्वी येथील आर.व्ही. पराडकर कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमध्ये १९२ जागा असताना केवळ नऊच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. कमी प्रवेश असणाऱ्या महाविद्यालयांची गरज काय ? जिल्ह्यात असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थी प्रवेश घेत नाही. अनेक महाविद्यालयात असलेल्या विद्यार्थी संख्येवरून तेथील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांवर होणारा खर्च निघत असल्याचे दिसून आले आहे. यातही विशेष म्हणजे ज्या महाविद्यालयात प्रवेश कमी आहे त्याच महाविद्यालयात शिष्यवृत्ती घोटाळ्याची मुळे आहे. इलेक्ट्रिकल टेलिकॉमची अवस्था दयनीय अभियांत्रिकी अभ्यासक्रमात असलेल्या विविध शाखांपैकी इलेक्ट्रिकल टेलिकॉमची अवस्था दयनीय आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयात या अभ्यासक्रमाच्या एकूण ३३३ जागा असून केवळ २७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. याची टक्केवारी केवळ ८ असून ९२ टक्के जागा रिक्त आहेत. यात शंकर प्रसाद अग्निहोत्री महाविद्यालयात या अभ्यासक्रमाच्या ६० जागा असून त्यात केवळ दोन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. ओेम अभियांत्रिकी महाविद्यालयात शून्य, सुरेश देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात एक, दत्ता मेघे ६० पैकी १६, अग्निहोत्री कॉलेज आॅफ अभियांत्रिकीत शुन्य, बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयात आठ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.