शहरं
Join us  
Trending Stories
1
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
2
राहुल गांधींनी मानले सर्व कार्यकर्त्यांचे आभार; हरयाणातील पराभवावर दिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
4
"बाप-बेटे हल्ली दारोदारी फिरतात, दारावर टक-टक करुन..."; आशिष शेलारांचे ठाकरे पिता-पुत्रांवर टीका
5
हरयाणा निकालामुळे भाजपाचं कमबॅक, मविआत संघर्ष; ठाकरेंचेही सूर बदलले, पडद्यामागचं राजकारण?
6
माधुरी की विद्या? नक्की कोण आहे मंजुलिका? कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैय्या ३' चा ट्रेलर रिलीज
7
प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेसाठी दहा उमेदवारांची केली घोषणा; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
8
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
9
जम्मू-काश्मिरमध्ये इंडिया आघाडीचे अवघे दोन हिंदू उमेदवार जिंकले, कोण आहेत ते? एकाने नोंदवला धक्कादायक निकाल  
10
Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात चांदी ₹२१२२ स्वस्त; Gold किती घसरलं?
11
₹६७ च्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ८ टक्क्यांची तेजी, एक घोषणा आणि स्टॉक सुस्साट
12
हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?
13
वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार
14
मुंबईतील हिंदी बहुल १२ मतदारसंघात परप्रांतीय उमेदवाराला प्राधान्य द्या; मविआला पत्र
15
"काँग्रेसच जिंकणार असं दाखवलं जात होतं...", हरयाणा निवडणुकीवर द ग्रेट खलीची प्रतिक्रिया
16
बापरे! होणारा नवरा सतत करायचा कॉल; मुलीने ब्लॉक करताच 'त्याने' केलं असं काही...
17
गुरु-शुक्र समसप्तक योग: ७ राशींना दसरा शुभ, मालामाल व्हाल; दिवाळीला धनलक्ष्मी प्रसन्न होईल!
18
5 लाखातून उभे केले 7000 कोटींचे साम्राज्य! Phanindra Sama चे स्टार्टअप काय?
19
SIP मध्ये मिळतात असे ७ फीचर्स जे दुसऱ्या स्कीम्समध्ये मिळत नाहीत, गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या
20
भारतासाठी 'करो वा मरो'चा सामना; 'कॅप्टन' हरमनप्रीत आज खेळणार? स्मृती मंधानाने दिली अपडेट

शहरात शिरलेल्या वन्यप्राण्यांना पर्यावरण बचाव समितीचा आश्रय

By admin | Published: July 14, 2017 1:32 AM

शहरीकरणामुळे जंगलाचा ऱ्हास होत आहे. यामुळे वातावरणात बदल होत असल्याने वन्यजीव मानवी वस्तीकडे धाव घेताना दिसतात.

लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : शहरीकरणामुळे जंगलाचा ऱ्हास होत आहे. यामुळे वातावरणात बदल होत असल्याने वन्यजीव मानवी वस्तीकडे धाव घेताना दिसतात. यावर्षी प्रखर उन्हाळा संपून दीड महिना झाला. पाऊसही बऱ्यापैकी झाला आहे. असे असताना वन्यजीव मानवी वस्त्यांकडे धाव घेताना दिसतात. शहरात शिरणाऱ्या या वन्यप्राण्यांना पर्यावरण बचाव समितीने आश्रय दिला आहे. आर्वी येथे मागील पाच दिवसांत तीन जखमी हरीण मिळाले. त्यात एक भेडकी व दोन चितळ नामक हरिण होते. यातील भेडकी ही काकडधरा येथे कुत्र्यांनी जखमी केलेल्या अवस्थेत आढळली. समिती सदस्यांनी तिच्यावर उपचार करून पिपल फॉर अ‍ॅनिमल वर्धा येथे उपचाराकरिता पाठविले. एक चितळ हमालपुरा येथे जखमी अवस्थेत आढळले. ते पर्यावरण बचाव समितीच्या सदस्यांनी उपचार केले. त्याची परिस्थिती सुधारल्यावर आर्वी वनविभागाचे शिवाजी सावंत यांच्या निगराणीत सारंगपूरी येथे सोडले. दुसरे चितळ जनतानगर येथे जखमी अवस्थेत असल्याचे समितीच्या कार्यकर्त्यांना कळविले होते. नागरिकांचे सहकार्य व वनविभागाच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. त्या चितळावर उपचार करण्यात आले; पण गंभीर जखमी असल्याने वाटेतच त्याचा मृत्यू झाला. ही समिती वन्यप्राण्यांना जीवनदान देण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहे.