शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

शासकीय नियमाला डावलूण मुरुमाच्या उत्खननाला उधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 16:50 IST

सावली वाघ येथील प्रकार : उद्धवसेनेचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : तालुक्यातील मौजा सावली (वाघ) येथील शासकीय जागेवर शासकीय नियमांना डावलून अवैधरीत्या दगड, मुरुमाचे गेल्या काही महिन्यांपासून उत्खनन सुरू आहे. उत्खनन आरक्षित जागा सोडून केले जात असल्याने याचा शेतकऱ्यांना त्रास होतो आहे. या प्रकारावर आळा घालावा, अशी मागणी उद्धवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख सतीश धोबे यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून केली आहे.

तालुक्यातील सावली (वाघ) येथे खनिकर्म विभागाच्या वतीने शासकीय जागेवर गौण खनिज मुरूम व दगड उत्खनन करण्यासाठी काही व्यक्तींनी जवळपास २१ हेक्टर जागेची परवानगी घेतल्याचे सांगण्यात आले आहे. या परवानगीची मर्यादा संपली असल्याचेही सांगण्यात आले. असे असताना शासकीय जागेवर पोकलेन, जेसीबी व विस्फोटक वापरून मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. यामुळे या परिसरात ३० ते ३५ फूट खोल गड्डे तयार झाले आहेत. उत्खननासाठी दिलेल्या आरक्षित जागा सोडून शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याच्या रस्त्यापर्यंत हे उत्खनन सुरू ठेवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्या येण्यास त्रास होत सहन करावा लागत आहे. विस्फोटक पदार्थामुळे शेतात काम करत असताना शेतकऱ्यांना याचा धोका निर्माण झाला आहे. 

सुरू असलेल्या प्रकाराची चौकशी करून या ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या विस्फोटक पदार्थांऐवजी मजूर लावून उत्खनन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या रब्बी हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांना शेतात काम आहे. त्यांना शेतात जाण्याचा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. त्यामुळे या विषयाची तातडीने दखल घेऊन स्थळ पाहणी करून कारवाई करावी, अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी उपतालुकाप्रमुख प्रकाश अनासाणे, माजी नगरसेवक मनीष देवडे, शंकर मोहम्मारे, शकील अहमद, फिरोज खान, आशिष वाघ, दीपक पावडे, रामाची किनाके, गजानन फरकाडे, राकेश राजूरकर, शकील एकोणकर, दिलीप कुकडे, गजाननराव धोटे, करण जेनेवार, अजय महाकाळकर, अनिल राजूरकर, नीलेश मानकर, योगेश ठग, प्रतीक पावडे, दीपक एकोणकर, संजय एकोणकर, विजय ठग, हनुमान गौळकर, रंजन डोमकावळे, दशरथ तिखट व भास्कर मानकर आदी शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते. 

शेतात जाणाऱ्या रस्त्याची लागली वाट शेतशिवारात जाणाऱ्या रस्त्यापर्यंत हे उत्खनन आले आहे. येथे दगड फोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्फोटकांमुळे रस्त्याची वाट लागली असून, होणाऱ्या आवाजाचा शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.

टॅग्स :wardha-acवर्धाMining Scamखाण घोटाळा