शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

कागदात बांधली सोन्याची अंगठी अन् कागद उघडताच निघाले दगड, वायगाव-वर्धा रस्त्यावरील घटना

By चैतन्य जोशी | Updated: March 30, 2023 18:09 IST

तोतया पोलिसांकडून फसवणूक

वर्धा : पुढे लूटमार होऊ शकते... बोटांतील सोन्याची अंगठी काढून ठेवा, आम्ही पोलिस आहोत, असे म्हणत व्यक्तीच्या बोटातील सोन्याची अंगठी एका कागदात बांधून त्याच्या बॅगमध्ये ठेवली. व्यक्तीने वर्धा येथे पाेहोचल्यानंतर बॅगमधील कागदाची पुडी उघडून पाहिली असता, त्यात सोन्याच्या अंगठीऐवजी चक्क दोन दगड निघाले. या व्यक्तीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने याबाबतची तक्रार सावंगी पोलिस ठाण्यात दाखल केली. सावंगी पोलिसांनी या प्रकरणी तोतया पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली असून, आरोपींच्या शोधार्थ पोलिस पथक रवाना झाल्याची माहिती दिली.

प्राप्त माहितीनुसार, गजानन वामन मानकर (५१, रा. वरुड) हे दुचाकीने वायगाव ते वर्धा रस्त्याने जात असताना सेलुकाटे परिसरात मागाहून एका दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना थांबविले. आम्ही पोलिस आहोत, अशी बतावणी एकाने केली. गजानन यांनी कशाला थांबविले, असे विचारले असता त्यांनी ‘तुमच्यासोबत समोर लूटमार होऊ शकते. तुम्ही बोटातील सोन्याची अंगठी काढून बॅगमध्ये ठेवा,’ असे म्हटले.

गजानन यांनी हातातील ६ ग्रॅम वजनाची अंगठी काढून आरोपींच्या हातात दिली. तोतया पोलिसांनी एका कागदात अंगठी बांधून ती पुडी गजानन यांना परत केली. गजानन यांनी कागदाची पुडी बॅगमध्ये ठेवली व तेथून सरळ वर्धा येथील एचडीएफसी बॅंकेत आले. त्यांनी बॅंकेत पोहोचताच बॅगमधील कागदाची पुडी उघडून पाहिली असता, त्या पुडीत सोन्याच्या अंगठीऐवजी दोन दगड होते. पोलिस असल्याचे सांगून आपली फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात येताच गजानन यांनी थेट सावंगी पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली.

पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांनी लगेच याची दखल घेत या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना केल्याची माहिती दिली. पुढील तपास पोलिस करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीPoliceपोलिसwardha-acवर्धा