शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

कर्जासाठी शेतकरी सावकारांच्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 5:00 AM

कोरोना संसर्गाच्या भितीने कृषी क्षेत्राचे संपूर्ण अर्थकारण बिघडले आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून शेतीचे ‘अर्थचक्र’च लॉकडाऊन झाले आहे. त्यात शासनाच्या कर्जमाफी योजनेचे कामकाज रखडल्याने शेतकऱ्यांना यावर्षी पीककर्ज मिळाले नाही. २०२० अखेरपर्यंत बहुतांश शेतकऱ्यांच्या नावे पीककर्ज थकबाकी असल्याने त्या शेतकऱ्यांना नवे पीककर्ज मिळाले नाही.

ठळक मुद्देजिल्ह्यातील २६ हजार नागरिकांवर ८३ कोटींचे कर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज वाटपाबाबत शासनाने बँकांना निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील बँकांनी आखडता हात घेतल्याने शेतकरी कर्जासाठी खासगी सावकारांचे उंबरठे झिजवत आहे. जिल्ह्यातील २६ हजार ९३० नागरिकांवर खासगी सावकारांचे तब्बल ८३ कोटी ८० लाख ८३ हजारांचे कर्ज आहे. सरकार केवळ कोरोनाच्या मागे लागल्याने यंदाचा खरीप हंगाम आणि पर्यायाने शेतकरीही संकटात सापडण्याची भीती व्यक्त होत असून हे कर्ज कसे फेडावे याच विवंचनेत शेतकरी आहे.कोरोना संसर्गाच्या भितीने कृषी क्षेत्राचे संपूर्ण अर्थकारण बिघडले आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून शेतीचे ‘अर्थचक्र’च लॉकडाऊन झाले आहे. त्यात शासनाच्या कर्जमाफी योजनेचे कामकाज रखडल्याने शेतकऱ्यांना यावर्षी पीककर्ज मिळाले नाही. २०२० अखेरपर्यंत बहुतांश शेतकऱ्यांच्या नावे पीककर्ज थकबाकी असल्याने त्या शेतकऱ्यांना नवे पीककर्ज मिळाले नाही. प्रत्येक शेतकऱ्याला तत्काळ पीककर्ज देऊ असे शासन सांगत असले तरी बहुतांश शेतकरी कर्जासाठी बँकेच्या चकरा मारीत आहे. त्यामुळे सध्या या शेतकऱ्यांकडे बि-बियाणे व खते खरेदीसाठी पैसे नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. नाईलाजास्तव शेतकरी सावकारांच्या दारी जात असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात एप्रिल महिन्यांपूर्वी वर्धा तालुक्यात १० हजार २६१ नागरिकांकडे खासगी सावकारांचे एकूण ६ कोटी ८२ लाख १७ हजार रूपयांचे कर्ज होते. सेलू तालुक्यात ३ हजार ३०६ नागरिकांनी ३ कोटी ८ लाख ५९ हजार रूपयांचे कर्ज घेतले आहे. देवळी तालुक्यातील ६ हजार २४ नागरिकांनी खासगी सावकारांकडून ६६ कोटी १३ लाख ४ हजार रूपयांचे कर्ज घेतले. हिंगणघाट तालुक्यातील ८१९ कर्जदारांकडे १ कोटी १९ लाख ६१ हजार रुपयांचे खासगी सावकारांचे कर्ज आहे. आर्वी तालुक्यातील १९२ नागरिकांकडे ३ कोटी ७२ लाख रूपयांचे कर्ज आहे. कारंजा तालुक्यातील ३ हजार ४८९ नागरिकांकडे तीन कोटी ७२ लाख रूपयांचे कर्ज घेतल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे. हातात पैसा नाही, रबीनेही खिसा गरम केला नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा सावकाराच्या दारात उभे होत असून शेतीमशागतीची कामे सुरू झाली असताना कशी करावी, याच विवंचनेत शेतकरी आहे.कागदपत्रांसाठी अडवणूकलॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना कर्ज देताना कागदपत्रांसाठी सक्ती करू नये, असे शासनाचे निर्देश आहेत. मात्र, जिल्ह्यातील बँका शेतकऱ्यांना सातबारा, आठ अ, चतुर्सीमा, पीकपेरा, शंभर रूपयांच्या स्टॅम्पपेपरवर कर्ज नसल्याचे घोषणापत्र, आधार कार्ड, पॅनकार्ड, हैशियत दाखला, आदींसारखी कागदपत्रे मागून शेतकऱ्यांची अडवणूक करीत असल्याची माहिती आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज