शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात डोंबिवली कनेक्शन समोर; शुटर्सपर्यंत पोहचवले शस्त्र
2
पक्षात एंट्री अन् १२ दिवसांतच लॉट्री; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी!
3
MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत धुसफूस; २८ जागांचा नेमका वाद काय?
4
योजनादूतांसाठी महत्त्वाची बातमी: काम नाही अन् पगारही मिळणार नाही, कारण...
5
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे असतील, त्यांना..."; राऊतांवर बरसले, पटोले काय म्हणाले?
6
लेटर'बॉम्ब'नंतर शरद पवारांची भेट भोवली, आ. सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन
7
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा खरा ठरणार?; मविआत वादाची ठिणगी, टोकाची भूमिका
8
महायुतीचं जागावाटप होणार फायनल? शिंदे, फडणवीस, पवारांची दिल्लीत शाहांसोबत बैठक
9
महाविकास आघाडीने मुख्यमंत्री ठरविण्यापेक्षा विरोधीपक्ष नेता ठरवावा, एकनाथ शिंदेंनी लगावला टोला
10
असा हा लपंडाव! मास्क लावून भाजपचा आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी गेला, पण कॅमेरे दिसताच...
11
'मला सिल्लोडमधून शिवसेनेचा (UBT) आमदार पाहिजे', सत्तारांविरोधात ठाकरेंचा उमेदवार कोण?
12
IND vs NZ 1st Test Day 3 Stumps : शेवटच्या चेंडूवर 'विराट' विकेट; सर्फराज 'नॉट आउट', आता...
13
दिवाळीची शॉपिंग करताय? 'या' क्रेडिट कार्ड्सवर मिळतेय बंपर ऑफर्स आणि कॅशबॅक...
14
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; आणखी ५ आरोपींना अटक
15
महाविकास आघाडीत कुरघोडी, जागावाटपावरून वाद; एक मित्रपक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत
16
राजकीय हालचालींना वेग! अजितदादांना आणखी एक धक्का बसणार, 'या' आमदाराने शरद पवारांची भेट घेतली
17
'कासव'गतीनं नऊ हजारी पल्ला गाठणारा भारतीय फलंदाज ठरला किंग कोहली
18
"भाजप तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करतंय", PCS परिक्षेवरून प्रियांका गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल
19
श्रीकांत शिंदेंनी विना परवानगी महाकाल मंदिराच्या गर्भगृहात केली पूजा; काँग्रेस नेते आक्रमक
20
ठाकरेंनी सांगोल्यातून कुणाला उतरवले मैदानात?; शहाजीबापू पाटलांचे वाढले टेन्शन!

सोयाबीनला भाव मिळाला तरच शेतकऱ्यांची दिवाळी गोड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 4:53 PM

परतीच्या पावसाचा तडाखा : अस्मानी, सुलतानी संकटाचे ग्रहण

विनोद घोडे लोकमत न्यूज नेटवर्क चिकणी (जामनी): दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या हिंगणघाट येथे धान्याची व सोयाबीनची काही मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. पण इतर धान्याची विशेष आवक नाहीत, हे मात्र तितकेच खरे. शेतकरी ही सोयाबीन विकून दिवाळी साजरी करण्याच्या तयारीत आहेत पण, चांगला भाव मिळाला तरच शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील शेतकरी चांगलाच मेटाकुटीला आला आहे, शेतकऱ्यांनी मागील वर्षीच्या उत्पादनातून शिल्लक राहिलेले काही धान्य, कडधान्य साठवून ठेवले होते. पण निसर्गाच्या अनियमितपणामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या लागवड खर्चासाठी घरी साठवून ठेवलेले उत्पादन मिळेल त्या भावात विकावे लागले. यामुळे आता दिवाळी सण तोंडावर आला असताना बाजार समितीत धान्याची आवक दिसून येत नाही. आता शेतकऱ्यांना नव्या सोयाबीनवरच अवलंबून राहावे लागत आहे. यंदा ऑक्टोबर महिना अर्धा उलटून गेला तरी वरुणराजा शांत व्हायचे नाव घेत नसल्याने सोयाबीन उत्पादकांना सोयाबीनचे उत्पादन घरी आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. हल्ली जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे सोयाबीन सवंगणीला आले आहेत. तर ज्यांचे सोयाबीन मळणीला आले आहे त्यांना वरुणराजा सतावत आहे. 

आता दिवाळी साजरी कशी करावी, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. जिल्ह्यातील ३० ते ४० टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीन घरी आले खरे पण सततच्या पावसाने तेही काळवंडले व बारीक झाले आहे. यामुळे उताराही चांगलाच घटला असून हल्ली प्रति एकर २ ते ३ क्विंटलचा उतारा मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. 

शेतकऱ्यांची दिवाळी अडचणीत"यावर्षी अतिप्रमाणात पडलेल्या पावसामुळे खरिपातील उभ्या पिकांची पुरती वाट लागली. यातून बचावलेले पीक वाचवण्यासाठी कर्ज काढून खर्च केला. पण आताही सतत पडत असलेल्या पावसामुळे सोयाबीन घरी येते की नाही, अशी भीती निर्माण झाली आहे. आता दिवाळी साजरी कशी करावी, ही मोठी समस्या निर्माण झाली आहे." - मनीष येणकर, शेतकरी

"पावसाच्या तावडीतून कसेबसे सोयाबीनची मळणी केली व उत्पादन घरी आणले. पण यामध्ये अधिक प्रमाणात ओलावा असल्याने याला वाळविण्यासाठी नाकात दम आला आहे. दिवाळीच्या पूर्वी हे सोयाबीन विक्री योग्य होते की नाही. याची शास्वती नाही. उत्पादनातही घट आल्याने यंदाची दिवाळी अंधारातच जाण्याची शक्यता आहे." - प्रवीण भोयर, शेतकरी

"अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे यंदाच्या सोयाबीनमध्ये अधिक प्रमाणात ओलावा आहेत, हे जरी सत्य असले तरी पण सोयाबीनचे भाव आधीच घसरले होते हेही तितकेच खरे आहे. तसेही शेतमालाच्या दरात चढ-उतार सुरूच असतो. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पाहिजे त्या प्रमाणात आवक नाही."- विक्की उमरे, व्यापारी

व्यापारी काय म्हणतात... "सोयाबीनचे दर आता जरी घसरले असेल तरी पुढे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी शेतकऱ्यांनी गरजेपुरते सोयाबीन विकावे. पूर्ण माल एकदाच न विकता टप्प्याटप्प्याने विकणे फायद्याचे ठरू शकतील. शेतकऱ्यांनी बाजारांचाही अंदाज घ्यावा."- प्रमोद ठाकरे, व्यापारी

टॅग्स :wardha-acवर्धाfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र