शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 21:58 IST

राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाऱ्या विरोधात शेतकऱ्यांनी आपला आक्रोश मांडला. लक्ष्मी मंगल कार्यालयात सर्व शेतकरी एकत्र आले. व तेथून टी-पॉर्इंटवर जाऊन आंदोलन करणार होते. दरम्यान विविध विभागाचे अधिकारीच शेतकऱ्यांच्या समोर उपस्थित झाले.

ठळक मुद्देअधिकारी मोर्चास्थळी पोहोचले : सातही दिवस सकाळी शेतीला वीज द्या

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत) : राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाऱ्या विरोधात शेतकऱ्यांनी आपला आक्रोश मांडला. लक्ष्मी मंगल कार्यालयात सर्व शेतकरी एकत्र आले. व तेथून टी-पॉर्इंटवर जाऊन आंदोलन करणार होते. दरम्यान विविध विभागाचे अधिकारीच शेतकऱ्यांच्या समोर उपस्थित झाले. व मोर्चातील शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले.यावेळी शेतकरी आरक्षणाचे प्रणेते शैलेश अग्रवाल, निलेश देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नयनसुख लढ्ढा यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यानंतर विविध वक्तयांनी मनोगत व्यक्त केले. आणि मोर्चाचा समारोप झाला. शेतातील ओलिताकरिता आठवड्यातील सात दिवस आठ तास वीजपुरवठा दिवसा करावा, बोंडअळीच्या मदतीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने जमा करावे, तूर, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांकरिता राज्य शासनाच्या १४ जून २०१८ च्या जीआर नुसार जाहीर केलेले. १००० रुपये प्रतिक्विंटल बोनस तत्काळ द्यावे, २०१८-१९ या हंगामातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची नोंद करुन शासनाने हमीभावाने खरेदी त्वरित सुरू करावी, कृषीपंप वीजजोडणीकरिता सहा महिन्यांआधी ज्या शेतकऱ्यांनी डिमांडनोटनुसार रकमेचा भरणा वीजवितरणकडे केला. त्या शेतकऱ्यांना विनाविलंब वीजजोडणी द्यावी. तळेगाव, चिस्तुर, आनंदवाडी, भारसवाडा, टेकोडा, बेलोरा आणि खडका या गावांची कृषीपंप व गावठाण वीज जोडणी एकाच लाईनवर असल्याने ब्रेक डाऊनचे प्रमाण वाढले आहे. या गावांची कृषीपंप व गावठाण लाईन वेगळी करण्यात यावी, आदी मागण्याकरिता शेतकऱ्यांनी मोर्चाचे आयोजन केले होते. या आक्रोश मोर्चा दरम्यान शेतकरी महामार्गावर चक्काजाम करू शकतात या भितीमुळे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.यावेळी सिंचन विभागाच्या अभियंत्यांनी मोर्चाच्या ठिकाणी येत शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. यामध्ये ज्या ज्या विभागाशी निगडित शेतकऱ्यांच्या मागण्या होत्या त्या- त्या विभागाचे सर्व अधिकारी, सिंचन विभाग, महावितरण, सहकार विभाग, वनविभागाशी निगडित असलेले सर्व अधिकारी हे यावेळी निवेदन स्वीकारण्यास मोर्चा स्थळी हजर होते.या आंदोलनात कुठल्याही राजकीय पक्षाचा सहभाग नव्हता तरीही मोठ्या प्रमाणात शेतकरी यात सहभागी झाले होते. या मोर्चाला निलेश देशमुख, शैलेश अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी यावेळी मांडल्या.

टॅग्स :Morchaमोर्चाFarmerशेतकरी