शहरं
Join us  
Trending Stories
1
"लिस्ट द्या, मतदारांना आणण्यासाठी फोनपे, जे काय लागेल...", शिंदेंच्या आमदाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार
2
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात डोंबिवली कनेक्शन समोर; शुटर्सपर्यंत पोहचवले शस्त्र
3
CSMT कडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा घसरला; कल्याण रेल्वे स्थानकातील घटना
4
Womens T20 World Cup: यंदा नवा चॅम्पियन! West Indies आउट; New Zealand संघानं गाठली फायनल
5
पक्षात एंट्री अन् १२ दिवसांतच लॉट्री; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी!
6
MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत धुसफूस; २८ जागांचा नेमका वाद काय?
7
योजनादूतांसाठी महत्त्वाची बातमी: काम नाही अन् पगारही मिळणार नाही, कारण...
8
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे असतील, त्यांना..."; राऊतांवर बरसले, पटोले काय म्हणाले?
9
लेटर'बॉम्ब'नंतर शरद पवारांची भेट भोवली, आ. सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन
10
सलमान खानने खरेदी केली बुलेट प्रूफ कार, बिश्नोई टोळीच्या धमक्यांमुळे सुरक्षेत वाढ
11
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा खरा ठरणार?; मविआत वादाची ठिणगी, टोकाची भूमिका
12
महायुतीचं जागावाटप होणार फायनल? शिंदे, फडणवीस, पवारांची दिल्लीत शाहांसोबत बैठक
13
महाविकास आघाडीने मुख्यमंत्री ठरविण्यापेक्षा विरोधीपक्ष नेता ठरवावा, एकनाथ शिंदेंनी लगावला टोला
14
असा हा लपंडाव! मास्क लावून भाजपचा आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी गेला, पण कॅमेरे दिसताच...
15
'मला सिल्लोडमधून शिवसेनेचा (UBT) आमदार पाहिजे', सत्तारांविरोधात ठाकरेंचा उमेदवार कोण?
16
IND vs NZ 1st Test Day 3 Stumps : शेवटच्या चेंडूवर 'विराट' विकेट; सर्फराज 'नॉट आउट', आता...
17
दिवाळीची शॉपिंग करताय? 'या' क्रेडिट कार्ड्सवर मिळतेय बंपर ऑफर्स आणि कॅशबॅक...
18
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; आणखी ५ आरोपींना अटक
19
महाविकास आघाडीत कुरघोडी, जागावाटपावरून वाद; एक मित्रपक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत
20
राजकीय हालचालींना वेग! अजितदादांना आणखी एक धक्का बसणार, 'या' आमदाराने शरद पवारांची भेट घेतली

शेतकरी समृद्ध झाला पाहिजे

By admin | Published: May 07, 2017 12:40 AM

मागील दोन वर्षांत राज्यात भाजपा सरकारने अनेक विकासात्मक योजना हाती घेतल्या आहे.

देवेंद्र फडणवीस : आर्वी शहर स्वच्छ करण्याचा संकल्प लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : मागील दोन वर्षांत राज्यात भाजपा सरकारने अनेक विकासात्मक योजना हाती घेतल्या आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पादन व मार्केट वाढविण्याच्या दृष्टीने सरकारचे सकारात्मक पाऊल राहणार आहे. शेतकरी उत्पादन वाढवून समृद्ध झाला पाहिजे, हाच विचार घेऊन आमची वाटचाल सुरू आहे, असे मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. शुकवारी पं.स. सभागृहातील आढावा बैठकीनंतर माजी आमदार दादाराव केचे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री फडणवीस संबोधित करीत होते. ते पुढे म्हणाले की, दोन वर्षांत शेतकरी संकटात सापडला; पण यावर्षी महाराष्ट्रात बारा टक्के उत्पादन वाढून ४० हजार कोटीने शेतपिकांचे उत्पादन वाढले आहे. पुढच्या अडीच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पादन कसे वाढविता येईल व शेती सुक्ष्म सिंचनातून कशी विकसित करता येईल, याबाबत ठोस पावले उचलणे सुरू आहे. आतापर्यंत शासनाने शहर स्वच्छ करण्यासाठी २१ हजार कोटी रुपये दिले. शहर स्वच्छ झाले तर रोजगार वाढतील. त्यासाठी आर्वी पालिकेने सर्वप्रथम शहर स्वच्छ करणे, सांडपाण्याचे काम व त्या पाण्याचे नियोजन या कामांना प्रथम प्राधान्य द्यावे, ते अग्रक्रमाने करण्यात येईल, असेही सांगितले. आर्वी तालुक्यातील उपसा सिंचन योजनेतून तयार झालेल्या सुक्ष्म सिंचन प्रकल्पातून शेतकऱ्यांच्या ९ हजार एकर शेताला सिंचन होऊन उत्पादन वाढेल, असा आशावादही फडणवीस यांनी व्यक्त केला. माजी आमदार केचे यांनी आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पाची समस्या, आर्वीत एमआयडीसीची गरज व इतर समस्या मुख्यमंत्र्यांनी मार्गी लावाव्या, असे सांगत आर्वी शहरासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठ्या प्रमाणात विकास निधी दिल्याचा उल्लेख केला. यावेळी खा. रामदास तडस, माजी खासदार विजय मुडे, आर्वीचे नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, जि.प. समाज कल्याण सभापती निता गजाम, सोनाली कलोडे मुकेश भिसे, कांचन नांदुरकर, युवराज ढोल, सुरेश खवशी, आर्वी न.प. उपाध्यक्ष पल्लवी काळे, वसंत भांगे, मुकूंद बारंगे, दाऊदी बोहरा व मुस्लीम समाजाचे पदाधिकारी, आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील जि.प., पं.स. व नगर पंचायत सदस्य, तालुक्याचे भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन करीत उपस्थितांचे आभार गजानन भोरे यांनी केले. यावेळी मुख्यमंत्र्यांना निम्न वर्धा प्रकल्पग्रस्त समिती, सर्कसपूर ग्रामस्थ, अंशकालीन कर्मचारी संघटना, निंबोली (शेंडे) येथील प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देत समस्यांबाबत अवगत केले. कार्यकर्त्यांचाही घेतला आढावा आढावा बैठकीनंतर माजी आमदार केचे यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. याप्रसंगी आपले सरकार शेतकऱ्यांसाठीच काम करणार असल्याचे सांगत भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्या पोहोचविण्याचे आवाहन केले. आर्वी, आष्टी, कारंजा या तीनही तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी हजर होते. आर्वी उपविभागातील कारंजा येथील नगर पंचायतीला विकास कामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आर्वी विधानसभा संघाचे आ. अमर काळे यांनी केली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करीत राष्ट्रीय महामार्गावरील शहर आणि नगर पंचायत झालेले कारंजा विकास कामात कसे मागे राहिले, हे समजावून सांगितले. याप्रसंगी कारंजा शहरासह आर्वी विधानसभा मतदार संघातील विविध समस्यांबाबत चर्चा केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व बाबी ऐकून घेत विकास कामांसाठी निधी कमी पडणार नसल्याची ग्वाही दिली.