शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत 'वाद' वाटप, चर्चा खोळंबली; राऊत-पटोले यांच्यात शाब्दिक वॉर, थेट दिल्ली दरबारी पोहोचली तक्रार!
2
मुंबईत ठाकरे गटच मोठा भाऊ; समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा देणार
3
आजचे राशीभविष्य - १९ ऑक्टोबर २०२४, कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील
4
पक्षबदलाची ऑक्टोबर हीट! भाजपचे राजन तेली, सुरेश बनकर, अजित पवार गटाचे दीपक आबा साळुंखे उद्धवसेनेत
5
छोट्या घटक पक्षांना हव्यात अधिक जागा; मविआ जागावाटपाचा विषय लांबला 
6
बालविवाह प्रथा संपुष्टात आणण्यास प्रत्येक जिल्ह्यात खास अधिकारी नेमा - सुप्रीम कोर्ट 
7
युद्धाचा भडका; सोन्याचा भाव ७७ हजार ९०० रुपयांवर, जीएसटीसह किती रुपये मोजावे लागणार? जाणून घ्या
8
सिद्दिकी हत्याकांड प्रकरण, पाच जणांना अटक
9
"लिस्ट द्या, मतदारांना आणण्यासाठी फोनपे, जे काय लागेल...", शिंदेंच्या आमदाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार
10
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात डोंबिवली कनेक्शन समोर; शुटर्सपर्यंत पोहचवले शस्त्र
11
CSMT कडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा घसरला; कल्याण रेल्वे स्थानकातील घटना
12
Womens T20 World Cup: यंदा नवा चॅम्पियन! West Indies आउट; New Zealand संघानं गाठली फायनल
13
पक्षात एंट्री अन् १२ दिवसांतच लॉट्री; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी!
14
MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत धुसफूस; २८ जागांचा नेमका वाद काय?
15
योजनादूतांसाठी महत्त्वाची बातमी: काम नाही अन् पगारही मिळणार नाही, कारण...
16
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे असतील, त्यांना..."; राऊतांवर बरसले, पटोले काय म्हणाले?
17
लेटर'बॉम्ब'नंतर शरद पवारांची भेट भोवली, आ. सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन
18
सलमान खानने खरेदी केली बुलेट प्रूफ कार, बिश्नोई टोळीच्या धमक्यांमुळे सुरक्षेत वाढ
19
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा खरा ठरणार?; मविआत वादाची ठिणगी, टोकाची भूमिका
20
महायुतीचं जागावाटप होणार फायनल? शिंदे, फडणवीस, पवारांची दिल्लीत शाहांसोबत बैठक

८१८ उमेदवारांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद

By admin | Published: February 17, 2017 2:05 AM

जिल्हा परिषदेच्या ५० आणि पंचायत समितीच्या १०० अशा एकूण १५० जागांकरिता गुरुवारी मतदान झाले.

जिल्हा परिषद व पंचायत समितीकरिता मतदान : सकाळपासूनच केंद्रावर मतदारांची गर्दी; प्रक्रिया शांततेतवर्धा : जिल्हा परिषदेच्या ५० आणि पंचायत समितीच्या १०० अशा एकूण १५० जागांकरिता गुरुवारी मतदान झाले. या जागांकरिता ८१८ उमेदवार रिंगणात होते. या सर्वच उमेदवारांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद झाले आहे. काही मतदार केंद्रावर रांगा असल्यामुळे अंतिम आकडेवारी उशिरापर्यंत प्राप्त झाली नव्हती. जिल्ह्यात ६३ टक्के मतदान झाल्याचा अंदाज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून वर्तविला. मतदार याद्यांच्या घोळामुळे हजारोनागरिक मतदानापासून वंचित राहिले.अंतिम आकडेवारीनुसार आष्टी (शहीद) तालुक्यात ६५, आर्वी ६७, समुद्रपूर ७४.५७ व देवळी ६९ टक्के मतदान झाले. अंतिम आकडेवारी न आल्याने हिंगणघाट ७०, वर्धा ५३, कारंजा (घा.) ६५ व सेलू ६८ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. दुपारी ३.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात ७ लाख ३१ हजार ९९२ मतदरांपैकी ३ लाख ४३ हजार ५९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात १ लाख ७८ हजार ८३६ पुरूष तर १ लाख ६४ हजार ७५६ स्त्री मतदारांचा समावेश आहे. असे असले तरी हिंगणी, घोराड, आंजी (मोठी), येळाकेळी, झडशी, तळेगाव (टालाटुले), सावंगी, केळझर, वायगावसह अनेक मतदान केंद्रवर सायंकाळी ५.३० वाजतानंतरही मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा कायम होत्या. जिल्ह्यात ९६१ केंद्रांवर सकाळी ७.३० वाजतापासून मतदानाला प्रारंभ झाला. कोरा येथील एक केंद्र वगळता जिल्ह्यात कुठेही इव्हीएममध्ये बिघाड झाल्याचे वृत्त नाही. येथे अर्धा तास उशिराने मतदान सुरू झाले. जिल्ह्यात सर्वत्र मतदानाचा उत्साह दिसून आला. सावंगी, वायगाव येथे भर दुपारीही मतदारांची गर्दी असल्याचे दिसून आले. मतदानाकरिता महिलांचा प्रतिसाद असलयाचे दिसून आले. असे असले तरी मतदार याद्यांच्या घोळामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहण्याची वेळ आल्याचे दिसून आले. अनेकांना केंद्रावर असलेल्या याद्यांत त्यांची नावे दिसली नसल्याने त्यांनी परतीचा मार्ग धरला. यामुळे वर्धा शहरातलगत असलेल्या भागात त्याचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.