शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

१० वर्षांपूर्वी दिले होते फिल्टर

By admin | Published: March 26, 2016 2:04 AM

जिल्ह्यातील बऱ्याच अंगणवाड्यामध्ये पाण्याची व्यवस्था नाही. येथे येणाऱ्या चिमुकल्यांना घरूनच पाणी आणावे लागत आहे.

शुद्ध पाण्याअभावी चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यातवर्धा : जिल्ह्यातील बऱ्याच अंगणवाड्यामध्ये पाण्याची व्यवस्था नाही. येथे येणाऱ्या चिमुकल्यांना घरूनच पाणी आणावे लागत आहे. १० वर्षांपूर्वी काही निवडक अंगणवाड्यांना वॉटर फिल्टर देण्यात आले होते; मात्र ते कुठल्या अंगणवाड्यांना वाटप केल्या गेले याची माहिती जि.प.च्या महिला व बालकल्याण विभागाकडे नाही. यामुळे हे फिल्टर खरच अंगणवाड्यांना की ते कागदावरच होते याचा शोध घेणे गरजेचे आहे. अंगणवाडीला पाणी पुरविण्याची जबादारी ग्रामपंचायतीकडे आहे. यावर ग्रामपंचायतीला १० टक्के निधी खर्च करावा लागतो. मात्र त्यांच्याकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. जिल्ह्यातील १,२८१ अंगणवाडी असून १७६ मिनी अंगणवाडी आहे. १,२८१ पैकी ३८ अंगणवाडी भाडेतत्वावर आहेत. यातील काही अंगणवाडी जि.प. शाळेच्या इमारतीमध्ये भरवल्या जात आहेत. अंगणवाडी इमारतीचा प्रश्न असताना विद्यार्थ्यांना शुध्द पाणी मिळत नाही. यामुळे अंगणवाड्यांतील चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अंगणवाडीतील मुलांना पुरविण्यात येत असलेले पाणी शुद्ध करण्याकरिता गतवर्षीपासून ‘जीवन ड्रॉप’ आणण्यात येत आहे; मात्र त्या ड्रॉपवरही वैधता दिनांक नाही. यामुळे विद्यार्थ्यांना अशुद्ध पाणीच पिण्याकरिता देण्यात येत असल्याची चर्चा जोरात आहे. काही अंगणवाडीतील ग्राम पंचायतीने नळ दिले आहे. कुठे हातपंप तर काही ठिकाणी विहिरीचे पाणी आहे. यामुळे या समस्येकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.अंगणवाडीच्या ३८ इमारती भाडेतत्त्वावर अंगणवाडीच्या इमारतीचीही दुरवस्था झाली आहे. एकूण ३८ अंगणवाड्या अद्यापही भाडे तत्वावर सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. भाडेतत्त्वावर असलेल्या १५ अंगणवाड्यांचे काम तांत्रिक अडचणीमुळे अर्धवट रखडले आहे. अंगणवाडी बांधकाम निधी राज्य शासनामार्फत येत असून ग्राम पंचायतीला जमा होतो. यामुळे कामाला पाहिजे तशी गती मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी येथे सुविधांची आणवा असल्याचे दिसून येत आहे.