शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय हालचालींना वेग! अजितदादांना आणखी एक धक्का बसणार, 'या' आमदाराने शरद पवारांची भेट घेतली
2
ठाकरेंनी सांगोल्यातून कुणाला उतरवले मैदानात?; शहाजीबापू पाटलांचे वाढले टेन्शन!
3
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची निशाणी मशाल घराघरात पोहचवा; उद्धव ठाकरेचं आवाहन
4
प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा; "शरद पवार मुख्यमंत्री असताना दुबई एअरपोर्टवर.."
5
लाजवाब! Sarfaraz Khan चा लवचिक अंदाज अन् त्यानं मारलेला कडक फटका बघाच (VIDEO)
6
Yahya Sinwar Death: याह्या सिनवारनंतर हमासची कमान कोण सांभाळणार? 'हे' टॉप ५ लीडर शर्यतीत...
7
ठाकरेसेनेची सत्तारांविरोधात मोठी प्लॅनिंग; थेट भाजपा नेत्याला पक्षात घेणार,२०० गाड्या मुंबईकडे
8
“शरद पवार ४ वेळा CM, केंद्रात-राज्यात एकच सत्ता, तरी राज्याचा विकास केला नाही”: उदयनराजे
9
"आई, मी माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला जातेय"; कुटुंबीय वाट पाहत राहिले पण मुलगी घरी आलीच नाही
10
आप नेते सत्येंद्र जैन यांना अखेर जामीन मंजूर; तब्बल 18 महिन्यानंतर तुरुंगातून बाहेर
11
भाजपला नवी मुंबईतही धक्का बसण्याची शक्यता; गणेश नाईक पक्ष सोडण्याच्या विचारात? 
12
Kareena Kapoor : सैफ नव्हे 'या' अभिनेत्यासाठी वेडी झाली होती करीना कपूर; बाथरूममध्ये लावलेले पोस्टर
13
“अजितदादांच्या त्रासाला कंटाळून भाजपा सोडतो, शरद पवार गटात जाणार”; कुणी केली घोषणा?
14
जालियनवाला बाग हत्याकांडानंतर काय घडलं? अक्षय कुमार-माधवनचा आगामी सिनेमा 'या' घटनेवर आधारीत
15
'वाळवा विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक'; सदाभाऊ खोतांनी उमेदवारीची केली मागणी
16
"यूपी से है, मराठी नहीं आती..."; मुंबई मेट्रोमध्ये परप्रांतीय कर्मचारी भरतीवरून वाद
17
सद्गुरुंच्या ईशा फाउंडेशनविरोधातील खटला बंद, सर्वोच्च न्यायालयाने दिली महत्त्वाची माहिती
18
आमच्या मतदारांची नावे यादीतून वगळण्याचं भाजपा-शिंदे सेनेचं षडयंत्र; मविआचा आरोप
19
जनरल तिकीट काढल्यानंतर तुम्हाला किती तासांनी ट्रेन पकडावी लागेल? जाणून घ्या, नियम...
20
अखेरपर्यंत खिळवून ठेवणारी मर्डर मिस्ट्री, कसा आहे अमेय वाघ-अमृता खानविलकरचा 'लाईक आणि सबस्क्राईब'?

पाण्याअभावी ‘रोपटे’ मोजत आहेत शेवटची घटिका

By admin | Published: February 17, 2017 2:16 AM

शहरातील बजाज चौक ते शिवाजी चौक या मुख्य मार्गावरील रस्ता दुभाजकात स्थानिक पालिका प्रशासनाच्यावतीने

पाण्याअभावी ‘रोपटे’ मोजत आहेत शेवटची घटिकापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज : मुख्य मार्गावरील प्रकारवर्धा : शहरातील बजाज चौक ते शिवाजी चौक या मुख्य मार्गावरील रस्ता दुभाजकात स्थानिक पालिका प्रशासनाच्यावतीने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व ओळखून ठिकठिकाणी विविध प्रकारचे रोपटे लावले. परंतु, सध्या हे रोपटे पाण्याअभावी शेवटची घटीका मोजत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. याकडे पालिका प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.समाजातील सर्व स्तरातून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासाठी कार्य केले जात असून शासनाच्यावतीनेही विविध योजना राबविल्या जात आहेत. शासनाच्या वृक्षसंवर्धनाच्या योजनेचा एक भाग म्हणून स्थानिक नगर पालिका प्रशासनाने पावसाळ्याच्या सुरूवातीला वर्धा शहरातील बजाज चौक ते शिवाजी चौक परिसरातील रस्ता दुभाजकात वृक्ष लावले. पावसाळ्यात त्या वृक्षांना पावसाच्या सरींनी आधार मिळाल्याने ते रोपटे जानेवारी अखेरपर्यंत हिरवेकंच होते. परंतु, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात उकाडा वाढल्याने व तापमानात वाढ झाल्याने सध्या या रोपट्यांनी पाण्याअभावी माना टाकल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. शहरातील मुख्य मार्ग परिसरात रस्ता दुभाजकात लावण्यात आलेले विविध प्रजातीची रोपटे जगविण्याकडे संबंधीतांचे सध्या दुर्लक्ष होत असल्याने वृक्षसंवर्धनाच्या उद्देशालाच फाटा मिळत आहे. सदर प्रकार गंभीर असल्याने याकडे पालिका प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची शहरातील वृक्षप्रेमींसह नागरिकांची मागणी आहे.(शहर प्रतिनिधी)